Rice cultivation : या खरीप हंगामात भात लागवडीचा उच्चांक; देशातही विक्रमी तांदूळ साठा..

Rice cultivation : चालू २०२५-२६ खरीप हंगामात देशात भात लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या २५ जुलै २०२५ रोजीपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशभरात २४५.१३ लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड झाली असून, गेल्यावर्षी याच कालावधीत हे क्षेत्र २१६.१६ लाख हेक्टर होते. यामध्ये तब्बल १३.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे यंदा मान्सून वेळेवर […]
kanda bajar bhav : उत्तरेकडील श्रावण संपणार; कांदा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार…

Kanda bajarbhav : उत्तर भारतात श्रावण महिना यंदा ९ ऑगस्टला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह इतर उत्तरेकडील राज्यांमध्ये कांद्याच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे सध्या घसरलेले कांदा बाजारभाव पुन्हा सावरतील, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटते, तर दुसरीकडे दिल्लीच्या आझादपूर मंडीतील कांदा व्यापारीही हीच शक्यता बोलून दाखवत आहेत. सध्या नाशिक, […]
Union Agriculture Minister : केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झालेय..

Union Agriculture Minister : राज्यात आणि देशात अनेक शेतकरी कर्जबाजारी होत असताना, कोरडवाहू भागातील शेतकरी आत्महत्येचे प्रमाण वाढलेले असताना आणि शेतमालाचे बाजारभाव घसरलेले असताना केंद्रीय कृषीमंत्र्यांनी मात्र मागील दहा वर्षात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होत आहे याबद्दल आत्मविश्वासपूर्वक सांगितल्याने आश्चर्य व्यक्त होत असून जखमेवर मीठ चोळल्याची भावना शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट […]
Irrigation project : राज्यातील ‘या’ सिंचन प्रकल्पांच्या दुरुस्तीला मंजुरी; हजारो शेतकऱ्यांना दिलासा..

Irrigation project : वर्धा जिल्ह्यातील दोन महत्त्वपूर्ण सिंचन प्रकल्प – बोर (ता. सेलू) आणि धाम (ता. आर्वी) – यांच्या दुरुस्तीला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४२८ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना नियमित, कार्यक्षम आणि वाजवी पाण्याचा पुरवठा मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. वर्षानुवर्षे वापरामुळे आणि हवामानातील बदलांमुळे या दोन्ही प्रकल्पांच्या […]
Soybean price : ऐन सणासुदीत शेतकऱ्यांच्या सोयाबीनसह तेलबियांचे भाव घसरणार?

Soybean price : केंद्र सरकारने अन्न तेल महाग होऊ नये यासाठी मोठा निर्णय घेतला असून, सोयाबीन, सूर्यफूल आणि त्यापासून बनणाऱ्या खाद्यतेलाच्या निर्यातीवरील शुल्कात कपात केली आहे. या निर्णयामुळे भारतात तेलाच्या किंमती कमी राहतील, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र याचा थेट फटका देशातील शेतकऱ्यांना बसेल. कारण, निर्यात कर कमी झाल्यामुळे या तेलबियांची देशांतर्गत मागणी आणि किंमत […]
E-NAM Scheme : शेतकऱ्यांच्या शेतमाल विक्रीला राष्ट्रीय बाजारपेठेचा मार्ग खुला; ई-नाम योजनेसाठी कायद्यात बदल…

E-NAM Scheme : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी व्यापक बाजारपेठ उपलब्ध व्हावी, त्यांना त्यांच्या मालाला रास्त दर मिळावा आणि बाजार व्यवस्थेत पारदर्शकता यावी, यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ‘ई-नाम’ (इलेक्ट्रॉनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट) योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मध्ये सुधारणा करण्यास नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात […]
Kanda bajarbhav : कांदा बाजारभावाची चांगली बातमी; बांग्लादेशात भारतीय कांद्याला मोठी मागणी..

KAnda bajarbhav : मागील काही दिवसांपासून राज्यात कांद्याचे बाजारभाव घटले असून आता सरासरी १ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव झाले आहे. अशा स्थितीत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित करणारी एक बातमी बांग्लादेशातून समजत आहे. सध्या बांगलादेशात कांद्याचे दर गगनाला भिडले असून, तेथे भारतीय कांद्याची मोठी मागणी निर्माण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा […]
Waiting for rain : राज्यात ८८ टक्के खरीप पेरणी; काही विभागांमध्ये पावसाची प्रतिक्षा..

Waiting for rain : दिनांक २१ जुलै २०२५ अखेर महाराष्ट्रात खरीप हंगामात एकूण १४४.३६ लाख हेक्टर क्षेत्रावर अपेक्षित पेरणी होती. यापैकी १२७.३९ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झालेली असून, हे प्रमाण सरासरीच्या ८८ टक्के आहे. यामध्ये ऊसाचा समावेश केल्यास राज्यात एकूण १५७.४८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी १२८.७८ लाख हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ८२ टक्के पेरणी झाली […]
Sugarcane crop : ऊस पिकासाठी शेतकऱ्यांना आता प्रतिहेक्टर १५ हजार रुपयांपर्यंत अनुदान..

sugarcane crop : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण उसाच्या लागवडीसाठी सरकारकडून आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवून “ऊस विकास कार्यक्रम” राबवण्यात येत आहे. यामध्ये ऊस उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक वाणांची लागवड, योग्य तंत्रज्ञानाचा वापर आणि कार्यक्षम साखर कारखान्यांमार्फत शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १५ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. […]
Crop insurance : पिकविम्याची मुदत ३१ जुलैला संपतेय; तुम्ही काढला का विमा?

Crop insurance : पिकविम्याची मुदत ३१ जुलैपर्यंत असून त्याआधीच शेतकऱ्यांनी विमा उतरवावा असे आवाहन करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, रोग व किडीमुळे पिकांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना देशभरात प्रभावीपणे राबवली जात आहे. खरीप २०२५ हंगामासाठी केंद्र आणि राज्य शासनाने ही सुधारित योजना पुन्हा सुरु केली आहे. या योजनेंतर्गत पिकाच्या नुकसानीपासून […]