गुळाचे दर क्विंटलला ४०० रुपयांनी सुधारले , कमी उत्पादनामुळे आवकेत मोठी घट शीतगृहा बरोबर संक्रांतीला व्यापाऱ्यांकडून खरेदी..

यंदाच्या हंगामामध्ये गुळाला चांगला दर मिळत असल्याने गुळउत्पादकांमध्ये समाधान पसरलेले आहे. पंधरवड्यापूर्वी असणारी मंदीचे मळप दूर झाले असून गुळाच्या दरात क्विंटल ला चारशे रुपयांपर्यंत सुधारणा झाली आहे . सध्या येथील बाजार समितीत येणाऱ्या गुळास प्रतिक्विंटल 3800 ते 4500 रुपयांपर्यंत दर मिळत आहे . प्रथम दर्जाच्या क्वचित प्रसंगी 4900 रुपयांपर्यंत दर जात आहे.  गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 35 टक्के गुराळे कमी प्रमाणात सुरू झाले आहेत.  त्यामुळे गुळाचे उत्पादन कमी होत आहे.  याचाच परिणाम आवक घटनेवरही झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत अडीच लाख आवक घटली आहे . ऊसाप्रमाणे यंदाचा गुळ हंगाम लवकर संपण्याची शक्यता आहे.  त्यामुळे गुजरात मधील व्यापाऱ्यांनी शीतगृहासाठी गुळ खरेदी सुरू केली आहे तसेच संक्रातीसाठी ही गुळ खरेदी सुरू करण्यास व्यापारी प्राधान्य देत आहेत.

या सर्व बाबींचा एकत्रित परिणाम गुळ दर सुधारण्यावर झाला आहे.  सध्या बाजार समितीत 30 ते 35 हजार गुळ रवी विक्रीसाठी येत आहेत.  येथील बाजार समितीत वर्षभर गुळाचे सौदे सुरू असतात.  यंदा पावसाळा कमी असल्याने पंधरवड्याचा कालावधी वगळता बाजार समितीत एक दिवसाआड गुळाचे सौदे होत होते.  मुख्य हंगाम दिवाळीनंतर सुरू झाला यंदा पाऊस फारसा नसल्याने गुऱ्हाळे सुरू होण्यास निसर्गाचा अडथळा आला नाही परंतु मंजूर टंचाई झाली त्यामुळे अनेक गुऱ्हाळे सुरू होऊ शकली नाहीत.  दरवर्षी शंभर ते 125 गुऱ्हाळे सुरू होतात ,यंदा मात्र ही संख्या 80 पर्यंत घसरली याचा साहजिकच परिणाम गुळाची आवक कमी होण्यावर झाला जसा हंगाम पुढे जाईल तशी गुऱ्हाळे जादा प्रमाणात सुरू होतील. पण अद्याप जितक्या संख्येने गुराळे सुरू होतील. तितक्या प्रमाणात सुरू झाली नाही. 

त्यामुळे बाजार समितीत गुळाची अवाक गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे.  पुढील दोन महिनेही अशी स्थिती राहणार असल्याने गुळाची आवक फारशी होणार नाही असे गृहीत धरून व्यापाऱ्यांनी ज्यादा खरेदीला प्राधान्य दिल्याने दरातही वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.

कर्नाटकातही गुळाची संख्या घटली.

गुजरात मधील व्यापारी तेथील शीतगृहात गुळ ठेवण्यासाठी कोल्हापूर बरोबर कर्नाटकातूनही गुळ मागवतात यंदा मजूर टंचाईचा फटका कर्नाटक येथील गुऱ्हाळ घरांना बसला आहे. या राज्यातील 50% गृहाळ घरे सुरू झाले नाहीत.  यामुळे व्यापारी येथील तूट भरून काढण्यासाठी कोल्हापूरच्या गुळाला मागणी नोंदवत आहेत.  याचा परिणाम गुळाचे दर वाढण्यावर झाला आहे.

गेल्या पंधरवड्यापासून गुळाच्या दरात सातत्याने सुधारणा होत आहे.  गुऱ्हाळांची घटती संख्या आणि रोडावलेली आवक यामुळे दरात वेगाने वाढ झाली. येणाऱ्या काही दिवसात गुळाचे दर चांगले राहतील अशी शक्यता आहे .

– के बी पाटील गूळ विभाग प्रमुख कोल्हापूर बाजार समिती

Leave a Reply