Kisan Samman Nidhi Yojana : किसान सन्मान निधी योजनेत समावेशासाठी व ई-केवायसी करण्यासाठी विशेष मोहीम राबवणार …

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये समावेश होण्यासाठी व लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे आवश्यक आहे त्यामुळे कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी  २१ फेब्रुवारी २०२४ पर्यंत विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

योजनेसाठी नव्याने नोंदणी करणे, या मोहिमेंतर्गत ईकेवायसी प्रमाणीकरण करणे, बँक खाती आधार क्रमांकास जोडणे आदी बाबींची पूर्तता करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः हा हजर राहणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी ईकेवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी मोबाईलवरील ओटीपी, पी.एम.किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप ,सामाईक सुविधा केंद्र, यापैकी एका सुविधेचा वापर करावा. बँक खाती आधार संलग्न नसलेल्या शेतकऱ्यांनी नजीकच्या पोस्ट कार्यालयामध्ये आधार संलग्न खाते उघडावे.

या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पी. एम. किसान योजनेचा १६ व्या हप्त्याचा लाभ वाटप करण्यात येणार आहे. या मोहिमेत योजनेच्या निकषांच्या अधिन राहून आवश्यक बाबींची पूर्तता करून घ्यावी. राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणाऱ्यां लाभार्थींनाच मिळणार आहे.याची नोंद घ्यावी.

यापूर्वी राबविण्यात आलेल्या ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ या ४५ दिवसांच्या मोहिमेदरम्यान १ लाख ४ हजार शेतकऱ्यांचे ई-केवायसी केले होते . तसेच ३ लाख १ हजार स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी करण्यात आली. ही मोहीम क्षेत्रीय स्तरावर प्रभावीपणे राबविण्यासाठी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तांनी निर्देश दिले आहेत.

अधिक माहितीसाठी नजिकचे कृषी सहायक,मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) दिलीप झेंडे यांनी केले आहे.

Leave a Reply