राज्यात अवकाळी पावसाने गेल्या चार दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे . विदर्भासह, मराठवाड्यात , मध्य महाराष्ट्रतही वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. राज्यामध्ये या काळात दिवसभर उन्हाचा चटका आणि संध्याकाळी पाऊस असे वातावरण पहायला मिळाले.
बुधवारी राज्यात ४२ ते ४३ अंश तापमानाची बहुतांश भागात नोंद झाली. दरम्यान राज्यात आजही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे असा हवामान विभागाने अंदाज दिला आहे . विदर्भासह मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात १८ ते २२ एप्रिल दरम्यान तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी ३० ते ४० किमी प्रतितास वाऱ्याचा वेग राहणार आहे.
यलो अलर्ट कुठे?
रायगड, रत्नागिरी, जळगाव, बीड, ठाणे, नाशिक,लातूर, नांदेड, धाराशिव,सोलापूर
उष्णतेच्या लाटेचा अंदाज
राज्यामध्ये तापमानात वाढ होत असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता १९ ते २१ एप्रिल दरम्यान देण्यात आली आहे. उष्ण व आर्दता कोकण आणि गोव्यात राहणार असून आज मराठवाड्यात व मध्य महाराष्ट्रात रात्र उष्ण राहण्याचा अंदाज देण्यात आला आहे.