कांद्याचे किमान निर्यातमूल्य भारताच्या स्पर्धक निर्यातदार देशांनी अर्ध्यावर आणले आहे.परंतु भारताने कांद्याचे किमान निर्यातमूल्य प्रतिटन ५५० डाॅलर ठरवून त्यावर ४० टक्के निर्यात शुल्क आकारला आहे. जागतिक बाजारामध्ये भारताच्या कांद्याचा दर ७१ रुपये आहे तर पाकिस्तानच्या कांद्याचे दर प्रति किलाे २७ रुपये आहेत . भारताचा कांदा महागात पडत असल्यामुळे निर्यात कमी आहे.
म्हणून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे दर कमी होत चालेले आहेत . केंद्र सरकार या व्यवहारात काही न करता प्रतिकिलाे १८ रुपयांची कमाई करीत आहे, हे विशेष!
भारताने कांद्यावरील निर्यातबंदी पाच महिन्यांनंतर उठविण्याचा निर्णय घेतला तेव्हा पाकिस्तानने त्यांच्या कांद्याचे किमान निर्यातमूल्य ७०० डाॅलरवरून ५०० डाॅलर, तर चीनने ५०० वरून ४०० डाॅलर प्रति टन,म्यानमारने ६०० डाॅलरवरून ५००, केले हाेते. त्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या कांद्याचे किमान निर्यातमूल्य आठवडाभरामध्ये प्रति टन ३२५ डाॅलर केले असून, इजिप्तने ६०० वरून ३०० डाॅलर केले, तर यमन ,चीन, व म्यानमारने त्यांच्या कांद्याचे निर्यातमूल्य शून्यावर आणले आहे.
कांद्याचा प्रति किलाे १३ ते १६ रुपये दर जिल्ह्यातील निर्यातक्षम हाेता. तो १८ ते २२ रुपयांवर दाेन दिवसांमध्ये पाेहाेचला. आता हाच दर १२ ते १७ रुपयांपर्यंत खाली आला आहे. जागतिक बाजारात भारताच्या कांद्याचा दर सरकारी निर्बंधांमुळे प्रति किलाे ७१ रुपयांवर पाेहाेचल्याने कुणीही खरेदी करायला तयार नाही.
त्यामुळे ऑर्डर मिळत नसल्याने निर्यात कमी झाली आहे, अशी माहिती निर्यातदारांनी दिली. देशांतर्गत बाजारात याच कारणामुळे कांद्याच्या दरात घसरण सुरू आहे.
दरवर्षी भारतामध्ये सरासरी ३०० लाख टन कांद्याचे उत्पादन हाेत असून,एकूण उत्पादनाच्या निर्यात ५ ते ७ टक्के आहे. भारताने सर्वाधिक २५.२५ लाख टन कांदा निर्यात सन २०२२-२३ मध्ये केला हाेता. चालू हंगामामध्ये कांद्याचे उत्पादन ११ टक्क्यांनी कमी असले तरी देशातील मागणी व वापर विचारात घेता किमान ५० लाख टन कांदा निर्यातबंदीमुळे शिल्लक राहिला आहे.
सरकारची आडमुठी भूमिका अडचणीची ..
भारताच्या निर्यातबंदीच्या पाच महिन्यांत ग्राहक देश इतर देशांकडे वळल्यामुळे भारताचे स्थान जागतिक बाजारात डळमळीत झाले आहे. ते स्थान पूर्वी सारखे मिळविण्यासाठी भारताने ग्राहक देशांना आकर्षित करून वाजवी दरामध्ये कांदा उपलब्ध करून द्यावा त्यासाठी सरकारची आडमुठी भूमिका अडचणीची ठरत आहे.
निर्यात कमी झाली..
पूर्वी निर्यातबंदी उठविल्यानंतर राेज कांद्याचे किमान ५०० कंटनेर कांद्याची निर्यात केली जायची. सध्या मात्र केवळ ४० कंटनेर कांद्याची निर्यात करण्यात येत आहे . कांदा प्रति किलाे १५ रुपये दराने खरेदी केल्यास एक कंटेनर कांदा निर्यात करायला किमान १३ लाख ५० हजार रुपये खर्च येत असतो .सरकारने हा कांदा २१ लाख रुपयांत म्हणजेच प्रति किलाे ७१ रुपये दराने विकण्याचे बंधनकारक केले आहे. इतका महाग कांदा खरेदी करायला कुणी तयार नसल्यामुळे कांद्याची निर्यात कमी झाली आहे.












