मागच्या दोन आठवड्यापासून राज्यात चांगला पाऊस पडत आहे जून महिन्याच्या मध्यानंतर पावसाची सरासरी काहीशी कमी झाली होती. त्यानंतर आता परत पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र आहे. विदर्भातील पूर्व भागांत व कोकण घाटमाथ्यावर चांगला पाऊस पडत असताना दिसत आहे.
तसेच , हवामान विभागाने आज (ता. १९) रोजी राज्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने आज कोकणातील रायगड, ठाणे ,सिंधुदुर्ग, रत्नागिरी,आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली असून कोकणातील रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे.
सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार तर नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा वगळता उर्वरित जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी राहील अशी शक्यता आहे.
मराठवाड्यातही बीड, लातूर छत्रपती संभाजीनगर,आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये पावसाचा कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. परंतु उर्वरित जिल्ह्यांमध्ये मात्र येलो अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर ,गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर वर्धा आणि नागपूर, अमरावती, या तीन जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यातील हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्हे वगळता सर्वदूर चांगल्या पावसाची शक्यता वर्तवली आहे.