Monsoon cooled : मॉन्सून थंडावला; उजनी, जायकवाडी, कोयनेत किती पाणीसाठा ?

Monsoon cooled

Monsoon cooled : राज्यात ५ जून २०२५ रोजी उपलब्ध माहितीनुसार सर्व मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकत्रितपणे सुमारे ३०.४१ टक्के एकूण पाणीसाठा आहे. या एकूण साठ्यात उपयुक्त पाणीसाठा १२,३१५.२० दशलक्ष घनमीटर असून तो उपयुक्त क्षमतेच्या तुलनेत ३०.४१ टक्के आहे. मागच्या वर्षी याच तारखेस हा उपयुक्त साठा २२.१६ टक्के होता, म्हणजेच यावर्षी थोडी सुधारणा दिसून येते.

राज्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या २८.४१ टक्के पाणीसाठा आहे, तर मध्यम प्रकल्पांमध्ये ३९.८९ टक्के आणि लघुप्रकल्पांमध्ये ३१.३९ टक्के साठा उपलब्ध आहे.

विभागनिहाय पाहता, नागपूर विभागात सर्वाधिक म्हणजे ३२.९७ टक्के उपयुक्त साठा आहे, अमरावतीत ३९.६९ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये २९.७८ टक्के, नाशिकमध्ये ३१.९१ टक्के, पुणे विभागात २६.०६ टक्के आणि कोकण विभागात ३४.४४ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी बहुतांश विभागांत साठ्यात वाढ दिसते.

राज्यातील प्रमुख धरणांबाबत बोलायचे झाले, तर गोसीखुर्द धरणात १८.२० टक्के साठा आहे (मागील वर्षी ३३.३६%), काटेपूर्णा धरणात १६.४२%, पैठण (जायकवाडी) धरणात २९.४५% (मागील वर्षी ४.१५%), माजलगावात १०.९५%, विष्णुपुरीमध्ये ५०.३०%, भंडारदरा धरणात २१.२२% (मागील वर्षी ६.९४%), निळवंडे येथे २६.६६%, गंगापूर ४४.४१%, गिरणा २१.५६%, दारणा ३५.५८%, राधानगरी ४८.७१%, खडकवासला ३६.९९% (मागील वर्षी ५१.९३%), पवना २६.०३%, पानशेत १७.०१%, नीरा देवघर ९.३८%, वारणा २५.१७% आणि कोयना १७.५८% साठा नोंदवण्यात आला आहे.

दरम्यान उजनी धरणात सध्या केवळ २९.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा असून, मागील वर्षी याच काळात पाणीसाठा अत्यल्प होता. उजनी धरण पाणवठा, शेतीसाठी पाणीपुरवठा आणि शेतीसह अनेक उद्योगांना आधार देणारे असून या धरणातील साठ्याच्या आकडेवारीकडे सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.

एकूण पाहता, राज्यात काही प्रमाणात साठा समाधानकारक असला तरी जून महिन्याच्या पुढील आठवड्यात मान्सूनच्या नियमित आणि जोरदार हजेरीची गरज आहे. त्यावरच पुढील साठा अवलंबून असणार आहे.