
kanda bajarbhav : मागील दोन आठवड्यापासून राज्याच्या कांदा बाजारात भाव स्थिरावले असून उन्हाळी कांद्याला आता चांगला दर मिळताना दिसतो आहे. आज दिनांक २९ मे २५ रोजी पुणे बाजारात कांदा भावात वाढ दिसून आली.
आज सकाळी पुण्याच्या गुलटेकडी बाजारात सुमारे १४ हजार क्विंटल लोक कांद्याची आवक झाली. कालच्या तुलनेत येथील कमीत कमी बाजारभाव १०० रुपयांनी वधारले असून ते ५०० रुपये प्रति क्विंटल इतके झाले आहेत. जास्तीत जास्त बाजारभाव १६०० रुपये प्रति क्विंटलवर स्थिर असून सरासरी बाजारभावात एकूण ५० रुपयांची वाढ बघायला मिळत आहे. पुणे बाजारात मागच्या आठवड्यापासून बाजारभावात १०० ते २०० रुपयांची चढ उतार पाहायला मिळत असून भाव काहीसे स्थिरावले आहेत.
दरम्यान आज पिंपरी बाजारात लोकल कांद्याला सरासरी १७०० रुपये. कमाल दर १८०० रुपये आणि किमान १६०० रुपये मिळाला. तर मोशी बाजारात किमान ४००, कमाल १४०० आणि सरासरी ९०० रुपये बाजारभाव मिळाला. सांगलीत सरासरी १ हजार ५० रुपये दर असून इस्लामपूरमध्ये सरासरी ११०० रुपये बाजारभाव मिळत आहे.
काल दिनांक २८ मे रोजी पिंपळगाव बसवंत येथे कांद्याला कमाल दर २३०० रुपये प्रति क्विंटल मिळाला होता. येथील सरासरी दर १५०० रुपये प्रति क्विंटल, तर किमान दर ५०० रुपये मिळाला. या ठिकाणी उन्हाळी कांद्याची सुमारे १८ हजार क्विंटल आवक झाली होती. दुसरीकडे लासलगाव बाजारात किमान दर वाढून ७०० रुपये कमाल दर २ हजार रुपये आणि सरासरी १३७५ रुपये बाजारभाव मिळाला. सोलापूर बाजारात कमाल दर २ हजार तर किमान १०० रुपये मिळाला आणि सरासरी ११५० रुपये प्रति क्विंटल मिळाला. कोल्हापूर बाजारातही कांद्याचे कमाल दर २३०० रुपये प्रति क्विंटल पोहोचले होते. किमान दर ५०० आणि सरासरी १५०० रुपये दर मिळाला. या ठिकाणी कांद्याची साडेतीन हजार क्विंटल आवक झाली.