राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले ‘हे’ महत्त्वाचे ११ निर्णय; जाणून घ्या..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ८ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत . त्यामध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी शक्ती स्थापन करण्यात येणार आहे.  त्यासोबतच मुंबईतील नरिमन पॉईंट या ठिकाणी असलेले एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख निर्णय.

◼️ धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. (इतर मागास बहुजन कल्याण)

◼️ राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता (उद्योग विभाग)

◼️ मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. (जलसंपदा विभाग)

◼️अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार (वैद्यकीय शिक्षण)

◼️मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा. (वस्त्रोद्योग विभाग)

◼️ गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार (इतर मागास बहुजन कल्याण )

◼️ विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा (सहकारविभाग)

◼️ मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार (पर्यटन विभाग)

◼️ बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार (गृह विभाग)

◼️ महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार (पशुसंवर्धन)

◼️ नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ (सार्वजनिक बांधकाम विभाग)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *