केंद्राच्या दुष्काळ पाहणी दौऱ्याला सुरुवात, आजपासून मराठवाडा, उ.महाराष्ट्राचा दौरा;..

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील निर्माण झालेल्या दुष्काळ पाहणी साठी केंद्रीय पथक महाराष्ट्रात दाखल झाले आहे.केंद्रीय कृषिमंत्र्यालयाचे 12 सदस्यांची पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा आजपासून दोन दिवसीय दौरा करणार आहेत.

ज्यात मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना ,बीड आणि धाराशिव जिल्ह्यात हा पाहणी दौरा केला आहे.  तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 14 डिसेंबर रोजी पुणे, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, जळगाव मध्ये हे पथक दुष्काळ पाहणी करणार आहेत.

केंद्रीय कृषिमंत्र्यालयाचे 12 सदस्यांचे पथक मराठवाड्यात दाखल झाले असून आज आणि उद्या मराठवाड्यातील चार जिल्ह्यात त्यांच्याकडून दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे . छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील काही तालुके व गावांमध्ये जाऊन हे पथक पाहणी करणार आहे.  छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील सांगवी तुळजापूर ,चौका ,मोरहिरा,खामखेडा, डोणवाडी तर सोयगाव तालुक्यातील जंगल तांडा, फर्दापूर,धनवड या 11 गावांचा यात समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यात आज करणार पाहणी.

केंद्रीय तीन सदस्य पथक आजपासून धाराशिव दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओम्बासे यांनी मंगळवारी दिली.  शासनाने धाराशिव ,दौऱ्यावर धाराशिव, वाशी तसेच अन्य तालुक्यातील 27 मंडळी दुष्काळी घोषित केले आहेत.या अनुषंगाने दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचे  एक त्रिसदस्यीय सदस्य पथक धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहे.  हे पथक धाराशिव तालुक्यातील ताकविकी, करजखेडा, लोहारा तालुक्यातील मार्डी, लोहारा बु, माळेगाव, धानुरी, तावशीगड येथे पाहणी करुन धाराशिवला  परतणार आहे. येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेऊन नंतर वाशी तालुक्यातील बोरी, वाशी, विजोरा व लोणखस शिवारात पाहणी करेल.

उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्याचा दौरा.

मराठवाड्यात आज पाहणी दौऱ्यावर ही पथक उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उद्या पाहणी करणार आहे.  पुणे, सोलापूर, नाशिक ,जळगाव जिल्ह्याचा समावेश आहे . दोन वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून ही पाहणी केली जाणार आहे . विशेष म्हणजे संपूर्ण पाहणी दौरे संपल्यावर पुण्यात एक महत्वाची बैठक घेऊन अहवाल केंद्राकडे पाठवला जाणार आहे. 

केंद्रीय पथकात यांचा  समावेश.

केंद्रीय कृषी विभागाच्या  सहसचिव प्रिया राजन या पथक प्रमुख आहेत.त्यांच्या नेतृत्वात चार पथक तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एमआयडीएचे सचिव मनोज के., सहसंचालक जगदीश साहू नीति आयोगाचे संशोधन अधिकारी शिवचरण मीना, पाणीपुरवठा विभागाचे अतिरिक्त सल्लागार ए. मुरलीधरन जलसंपदा विभागाचे संचालक हरीश उंबरजे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. उपसचिव प्रदीपकुमार, पुरवठा विभागाचे सचिव संगीतकुमार, पशुसंवर्धन विभाग सहआयुक्त एच. आर. खन्ना, कापूस विकास विभागाचे संचालक डॉ. ए. एच. वाघमारे, एमएनसीएफसीचे उपसंचालक डॉ. सुनील दुबे, एमआयडीएचे कन्सलटंट चिराग भाटिया यांचा पथकात समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *