राज्यामध्ये एकीकडे तापमानामध्ये वाढ होत आहे ,भारतीय हवामान विभागाने देशासह राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता दिली आहे. मराठवाड्यातील लातूर, बीड,धाराशिव जिल्ह्यांमध्ये तसेच महाराष्ट्रात विदर्भातील चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
30 मार्च रोजी या तीन जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा हवामान अंदाज केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार देण्यात आला आहे.कमाल तापमानामध्ये पुढील चार दिवसात वाढ होऊन रात्रीच्या वेळी आणखीन उष्णता जाणवेल व त्यानंतर कमाल तापमान कमी होण्याची शक्यता आहे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्हयामध्ये पुढील तीन दिवसात कमाल तापमान जास्त राहण्याची शक्यता आहे.
29 मार्च ते 04 एप्रिल दरम्यान मराठवाडयात पाऊस सरासरीपेक्षा कमी असेल ,कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी असेल तर किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे तर जमिनीतील ओलावा कमी झालेला आहे.असे सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार समोर आले आहे .












