शेतमालाच्या निर्यातीसंदर्भात मोठा निर्णय ! सरकार केळी आणि आंब्यासह 20 पिकांची निर्यात वाढवणार,याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का?

शेती क्षेत्रामध्ये सतत नवीन नवीन बदल घडत आहेत. अनेक शेतकरी वेगवेगळे प्रयोग करत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून सरकार देखील विविध योजना, नवीन धोरणे आखत आहे. शेतमालाच्या निर्यातीसंदर्भात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार केळी आणि आंब्यासह 20 पिकांची निर्यात वाढवणार आहे. सरकारने शेतमालाची निर्यात दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. एक कृषी आराखडा यासाठी तयार करण्यात येणार आहे. दरम्यान, याचा शेतकऱ्यांना फायदा होईल का असा प्रश्न केला जातोय. तर शेतकऱ्यांना या निर्यात धोरणाचा फायदा होणार आहे. निर्यती वाढल्यामुळे शेतमालाला जास्तीचा दर मिळेल.

कृषी निर्यात वाढवण्याचे सरकारचे ध्येय..

कृषी निर्यात वाढवण्याचे सरकारचे ध्येय आहे. यासाठी 20 कृषी उत्पादनांची यादी तयार करण्यात आली आहे . यासंदर्भातील एक कृषी आराखडा देखील तयार करण्यात येणार आहे . या निर्यातीचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये नियमन नसलेल्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला आहे . या 20 उत्पादनांची निर्यात क्षमता 56.7 अब्ज डॉलर्सपेक्षा अधीक आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनांना जास्तीचा दर मिळणार आहे. शेतमालाच्या निर्यातीच्या संदर्भातील माहिती वाणिज्य विभागाचे अतिरिक्त सचिव राजेश अग्रवाल यांनी दिली आहे . यासंदर्भातील कृषी आराखडा येत्या तीन ते चार महिन्यामध्ये तयार करण्यात येणार आहे . आता सध्याचा विचार जर केला तर जागतिक निर्यातीमध्ये भाराताचा वाटा कमी आहे . जगाच्या तुलनेमध्ये भाराताचा निर्यातीचा वाटा केवळ 2.5 टक्के आहे. त्यामुळं सरकारचा प्रयत्न आहे की हा वाटा चार ते पाच टक्के करण्याचा आहे.

कोण कोणत्या पिकांचा समावेश निर्याततीत होणार?

सरकार कृषी मालाच्या निर्यातीमध्ये मोठी वाढ करण्याचा प्रयत्न करत आहे. भारताची निर्यात जागतिक उत्पादनामध्ये वाढवण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, टरबूज, पेरू, हिरवी मिरची,द्राक्षे, डाळिंब,लसूण, कांदा, शेंगदाणे, शिमला मिरची, भेंडी, काजू, म्हशीचे मांस, गूळ, नैसर्गिक मध आणि तूप यांचा समावेश आहे. निर्यातीच्या संदर्भातील कृती आराखड्यावर सध्या काम चालू आहे. काम लवकरच पूर्ण होऊन निर्यात सुरु होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील आराखड्याचे काम पुढील चार महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे.

भारतीय कृषी उत्पादनांना मोठी मागणी..

भारतीय कृषी उत्पादनांना सध्या जगभरामध्ये मोठी मागणी आहे. उत्पादकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार वेगाने कृती योजना तयार करत आहे. कॅनडा, रशिया, जर्मनी,अमेरिका,इंडोनेशिया, जपान, इटली, मलेशिया, फ्रान्स, कोरिया, चीन, बेल्जियम आणि यूके या देशांना मोठ्या प्रमाणात कृषीमालाची निर्यात केली जाते.

Leave a Reply