
शेतजमीन मला विकत घ्यायची आहे, परंतु माझ्या नावावर सातबारा नाही. माझ्या आजोबांच्या नावावर होता परंतु ती शेती त्यांनी त्यांच्या काळात विकली तर मी आता ती शेतजमीन खरेदी करू शकतो का?
शेतकरी असणाऱ्या कुटुंबालाच शेतजमीन देण्याचा नियम आल्याच्या नंतर अनेकांसमोर शेतजमीन घेण्याचा प्रश्न उभा राहिला आहे . केवळ वडिलोपार्जित शेती नसल्यामुळे शेती करायची इच्छा असलेल्या खूप जणांना शेतजमीन खरेदी करण्यास मज्जाव करण्यात आला.
हा कायदा शेतजमिनीवर शेतकऱ्यांचा अधिकार असल्याच्या उद्देशाने अस्तित्वात आला. आधीच्या पिढ्यांनी शेतजमीन विकल्याचे अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये समोर आले.त्यामुळे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना शेतजमीन घेताना मर्यादा आल्या.
वडिलोपार्जित शेतजमीन नसली तरी आपल्या आजोबांच्या शेतीचे वारस तुम्ही होता व सातबारा त्या काळातला आहे, याचा पुरावा जमा करावा लागतो. ती शेतजमीन कधी कोणाला आजोबांनी विकली याची तारीख माहीत असेल तर किंवा त्या विक्री पत्राची त्या माणसाकडून एक कॉपी घेतली तर त्यावरून तुम्हाला शेतीचा जुना ७/१२ खाते नंबर मिळेल.
जुना रेकॉर्ड बघून जुन्या काळच्या रेकॉर्डची कॉपी त्या नंबरवरून मिळवता येत असते . यावरून तुम्ही वंशपरंपरेने शेतकरी आहात हे सिद्ध करण्यात मदत होते . यावरून संबंधित अधिकारी यांच्याकडून शेतकरी असल्याचे प्रमाणपत्र संबंधित अधिकारी यांच्याकडून तयार करून घेणे हा उत्तम पर्याय असतो. या कागदाची जमवा जमव झाली तर तुम्हाला शेतजमीन विकत घेता येईल.
याशिवाय चुलत काका, आईचे वडील, काका इत्यादींना सांगून त्यांच्या शेतात हिस्सा घेणे किंवा देत आहे, असे म्हणून नाव घालून घेणे अलीकडे हा एक पर्याय वापरण्यात येत आहे . हे तात्पुरते स्वरूपात असे केले तरी शेतकरी म्हणून नाव लागू शकते. आणि मग शेती घेऊन झाली की परत हक्कसोड करता येते.
यात नैतिक प्रश्न आवश्यक येऊ शकेल, परंतु कायद्याच्या विरोधात काहीही नाही. वारस म्हणून ज्याला शेती मिळते तो आपोआप शेतकरी होतोच. एमएलआरसीच्या कलम ७० अ व ७० ब चा उपयोग करून देखील शेतकरी होण्याचा मार्ग मोकळा होत असतो .