
ही परिस्थिती साधारणतः सकाळी ११ ते १ ते ११.३० काढलेल्या द्राक्ष फळांमध्ये दिसून येईल. यावेळी मण्यातून पाणी निघून जाण्याची शक्यता कमी असते. द्राक्ष फळांची प्रत टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने द्राक्षघडाची हाताळणीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे.
फळकाढणी करताना हातमोजांचा वापर, द्राक्षघड क्रेटमध्ये एकामेकांवर पडणार नाहीत अशा प्रकारे ठेवणे म्हणजेच फळांची हाताळणी होय. घडाच्या मण्यावर कोणतीही इजा होऊ नये, याकरिता क्रेटच्या तळामध्ये कुशनिंग करणे गरजेचे आहे.
कुशनिंगकरिता बबलशीटचा वापर करावा. फळकाढणी झाल्यानंतर त्वरित द्राक्षघड सावलीत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. फळ काढणीच्या एक ते दोन दिवस आधी घडातील सुकलेले मणी, तडे गेलेले मणी, करप्याचे डाग असलेले मणी काढून घ्यावेत. जेणेकरून फळकाढणीच्या वेळी चांगल्या प्रतिची द्राक्ष उपलब्ध होतील. असा सल्ला राहुरी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.