
नुकत्याच झालेल्या पावसाने तुरीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादनात आणखीन घट येण्याची शक्यता आहे. या कारणाने नव्या हंगामातही तुरीला भाव चांगला मिळू शकतो. तूर आवकेच्या हंगामात सरासरी 8 हजारांच्या दरम्यान भाव राहू शकतो.
बाजारामध्ये तुरीची आवक कमी झाल्यानंतर भावामध्ये सुधारणा होऊ शकते असा अंदाज तूर अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.बाजाराचे समीकरण पावसामुळे तुरीचे नुकसान झाल्याने बदलण्याची दाट शक्यता वाटत आहे. कारण उत्पादनात मोठी घट येऊ शकते आणि आधीच देशात तुरीची लागवड गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे. दुष्काळी स्थितीचाही फटका पिकाला बसत होता. त्यामुळे उत्पादनही कमी राहण्याची शक्यता आहे.
आता उत्पादनातील घट पावसाने फटका दिल्यामुळे जास्त राहू शकते. मराठवाडा आणि विदर्भ या महत्त्वाच्या तूर उत्पादक भागात पावसाने धुमाकूळ घातला आहे. इतर पिकासह तुरीचे नुकसान झाले, तूर पीक फुले आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत असल्याने नुकसानीची पातळी जास्त आहे.दुष्काळ आणि आता अवकाळी पावसाने नुकसान झाल्यामुळे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा किमान 20 ते 30 टक्के पर्यंत कमी राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. गेल्या हंगामामध्ये देशात 33 लाख टन उत्पादन झाले होते. यंदा उत्पादन तीस लाख टना पेक्षाही कमी राहू शकते असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक व्यक्त करत आहेत. कारण तूर पिकाला कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमध्ये फटका बसला आहे . त्यामुळे उत्पादन कमी आहे.
बाजार कसा राहील?
नवीन तूर महिनाभरामध्ये बाजारात दाखल होणार आहे. जानेवारीनंतर बाजारातील आवक वाढेल सध्या बाजारात तुरीला सरासरी दहा हजाराचा भाव मिळत आहे . देशातील उत्पादन आणि मागणीची स्थिती लक्षात घेता ऐन आवकेच्या हंगामातही तुरीला किमान आठ हजाराचा भाव मिळू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.तर आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर बाजार भावात सुधारणा होण्याची शक्यता आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर भावपातळी पुन्हा दहा हजाराचा टप्पा पार करेल असे अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
आयातीचा काय परिणाम होईल?
आवाक होण्याच्या हंगामात भावावर दबाव राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे आयातीचे. आफ्रिका व इतर देशांमधून तूर आयात होईल , आयातीचे करार ६ ते ७ हजारांनी झाले आहेत. काही दिवस आपला नवा माल आणि आयात यामुळे बाजार ८ हजारांच्या दरम्यान राहू शकतो. पण आयात मालही आपली गरज पूर्ण करून शकणार नाही . कारण तुरीचा पुरवठा आणि मागणी यात मोठी तफावत असेल तफावत जास्त असल्याने तूर दहा हजारांना विकली जात आहे .तूर बाजारातील अभ्यासकांनी पुढील हंगामातही हीच स्थिती राहू शकते. त्यामुळे तुरीला चांगला भाव मिळू शकतो, असा अंदाज व्यक्त केला.