या अभियानाची रचना शेतकरी संवादात्मक आणि भागीदारीच्या स्वरुपाची आहे. प्रत्येक गावात तीन सत्रांमध्ये (सकाळ, दुपार, सायंकाळ) चर्चा होणार असून, शेतकरी त्यांच्यासमोर उभ्या असलेल्या समस्यांबद्दल माहिती देतील आणि थेट प्रश्न विचारतील. यामुळे भविष्यातील संशोधनासाठी दिशा मिळणार आहे.
या उपक्रमात 113 आयसीएआर संस्था, 731 कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यापीठे, एफपीओ आणि नवोन्मेषी शेतकरी सहभागी होणार आहेत. सुमारे 16,000 कृषी वैज्ञानिकांचे ज्ञान थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम आहे.
अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शास्त्र, तंत्रज्ञान आणि अनुभवाचा संगम, ज्याद्वारे भारताला “जगाची अन्नटोपली” बनवण्याचे उद्दिष्ट साध्य होणार आहे. 1.3 कोटीहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग अपेक्षित असलेल्या या अभियानामुळे भारतातील शेतीत सतत सुधारणा, शाश्वत उत्पादन आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विकास घडेल, असा सरकारचा विश्वास आहे.












