अहमदनगरची मिरची थेट युरोपात, नव्वद दिवसांत घेतले २ टन उत्पादन,वाचा सविस्तर ..

दहिगाव बोलका येथील शेतकरी आनंद मालकर यांनी असा विचार केला की तेच ते पीक घेण्यापेक्षा शेतात असे पीक घ्यावे की, त्यातून चांगले उत्पादन मिळेल, असा विचार करून एक एकरात हिरव्या मिरचीचे पीक घेतले आहे.

मिरचीची लागवड करण्या अगोदर शेताची पूर्व मशागत करून घेतली व त्यानंतर  एका एकरामध्ये त्यांनी ५ ट्रॉली शेणखत टाकले. शेतामध्ये ४.२५ फुटांवर समांतर वरंबा करून घेतला व त्यामध्ये ३ गोण्या डीएपी खत आणि तीन निंबोळी पेंड मिसळून टाकले . २८ जानेवारी रोजी त्यांनी शेतामध्ये ठिबक अंथरून व त्यावर मल्चिंग पेपर घालून दीड फूट अंतरावर ७,५०० शार्क वन जातीची रोपे याच वर्षी लावली . या जातीची मिरची उंच वाढते, तसेच त्याच्या फांद्याही मोठ्या प्रमाणात डफळतात, त्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी बांबू व तार वापण्यात येते . त्यांनी मिरची तोड गेल्या महिन्यापासून सुरु केली आहे , फक्त नव्वद दिवसांमध्ये दोन टन उत्पादन निघाले आहे.

अजून त्यांच्या मिरचीचे उत्पादन सहा महिने सुरू राहणार आहे , मालकर यांच्या अंदाजाने आणखीन दहा ते बारा टन उत्पादन निघेल. आता ची मिरची ही सध्या युरोपियन देशांत निर्यात केली जात आहे . सध्या मिरचीला किलोला 55 ते 60 रुपये भाव मिळत आहे. निर्यातक्षम मिरचीचे उत्पादन घेण्यासाठी सेंद्रिय खत वापरावे लागते , या मिरचीसाठी दोन दिवसाआड गोमूत्र, गूळ ,शेणखत, यापासून बनविलेली 50 लीटर स्लरी ठिबकद्वारे सोडावी लागते. प्रत्येक ओळीच्या सुरुवातीला व शेवटी झेंडू ची लागवड केली आहे. शेताच्या चौहू बाजूने शेडनेटचा वापर केला आहे जेणे करून उन्हाचा, तसेच मध्याचा अटकाव होण्यास मदत मिळेल .दररोज 30 मजुरांना मिरची तोडणीमुळे काम मिळू लागले आहे.

काय म्हणाले शेतकरी?

निर्यातीची मिरची निवडत असताना तिच्यातून वाकडी असलेली मिरची , लाल रंगाची, पाला यांना बाजूला काढावा लागतो ,असे शेतकरी संतोष मालकर म्हणाले . वीस किलोच्या बॉक्स मध्ये ती पॅक करून पाठवावी लागते.ती पुन्हा तेथे तपासण्यात येते , मग ती निर्यात करण्यात येते . मिरची लागवडीपासून आतापर्यंत जवळपास एक लाख रुपये खर्च झाला असला,तरी शेतकरी आनंद मालकर म्हणाले तरी त्यापासून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची शाश्वती निर्माण झाली आहे.

Leave a Reply