‘या’ ४ जिल्ह्यांमध्ये कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा, वाचा सविस्तर ..

कांद्यावरील निर्यातमूल्य व निर्यातशुल्क केंद्र सरकारने वाढवल्यामुळे निर्यात मंदावली आहे. त्याचबरोबर कांद्याचे दर कमीजास्त होत आहे याच दरम्यान आता कांदा महाबँक प्रकल्प सुरू करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यामध्ये अणुउर्जा आधारित महाबँक प्रकल्प अहमदनगर ,नाशिक, छत्रपती संभाजीनगर, आणि सोलापूर या चार जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याच्या सूचना मुख्य मंत्रांनी दिल्या आहेत.

अधिक माहितीनुसार, सह्याद्री अतिथीगृह येथे कांदा महाबॅंक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली . यावेळी पणनमंत्री अब्दुल सत्तार,राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार मनोज सौनिक, मित्रा चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रविण परदेशी, विविध विभागांचे अपर मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, प्रधान सचिव, सचिव उपस्थित होते. दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून परमाणु आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर सहभागी झाले होते.

कांदा हे नाशवंत पीक आहे त्यामुळे त्यावर अणुऊर्जेच्या माध्यमातून विकिरण प्रक्रिया करून कांद्याची साठवणूक करता येईल. शेतकऱ्यांना कांदा बँकेच्या माध्यमातून मोठा फायदा होणार आहे. कांद्याची महाबँक ही संकल्पना प्रत्यक्षात स्थापन होत असून अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथून त्याची सुरूवात होत आहे. याठिकाणी हिंदुस्थान अग्रो संस्थेच्या माध्यमातून कांद्याची बँक सुरू करण्यात येणार आहे असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या ,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पणन, यांच्या जागांचा वापर करण्यात येणार आहे.

कांद्याची बँक ही समृद्धी महामार्गालगत सुमारे १० ठिकाणी करण्याचे प्रस्तावित आहे. कांद्याची साठवणूक करण्यासाठी कांद्याच्या महाबँकेचा उपयोग होईल कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर तो शेतकऱ्यांना विकता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *