अनेक शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडी वेळेवर झाल्यामुळे कपाशीला फुले आणि बोंडे लागले आहेत व त्यावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात आहे. कापसाला पाते, फुले व काही प्रमाणात बोंडे सध्या वातावरण ढगाळ असल्यामुळे लागले आहे , फुले , बोंडे लागल्यामुळे गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झाले आहे .
कापूस पिकामध्ये पाते, बोंडे ,फुले यावर बोंडअळी अंडी घालतात, यावर्षी कपाशी पिकाची लागवड एकाच वेळी न होता टप्याटप्याने झालेली आहे, किडीला त्यामुळे सारखे खाद्य उपलब्ध होत आहे त्यामुळे गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढणार अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.
म्हणून कामगंध सापळे कपाशीच्या पिकात लावणे गरजेचे आहे . त्यामुळे होणारा प्रादुर्भाव आतापासूनच निरीक्षणाद्वारे कमी होण्यास मदत होईल आणि पुढील नुकसान टाळता येणार आहे .
उपाययोजना..
1) हेक्टरी ५ या प्रमाणात कामगंध सापळे कापूस पिकाच्या उंचीच्या एक ते दीड फूट उंच लावावीत.
2)पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या आतील अळीसह तोडून जमा करून जाळून किंवा जमिनीत पुरून नष्ट कराव्यात.
3) गुलाबी बोंडअळीचे एका एकर क्षेत्रामध्ये ८ ते १० कामगंध सापळे लावावेत. यामुळे मोठ्या प्रमाणावर पतंग जमा करून नष्ट करण्यास मदत होईल .
4)कपाशीच्या शेतात पक्षांना बसण्यासाठी हेक्टरी किमान २५ पक्षी खांबे लावावीत , त्यामुळे पक्षी त्यावर बसून शेतातील अळ्या खाऊन नष्ट करतील.
5) पीक ६० दिवसांचे झाल्यावर ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशी ने परोपजीवीग्रस्त झालेले ट्रायकोकार्ड प्रति एकरी २-३ (६०,००० अंडी) या प्रमाणात दोन वेळा लावावे.
6) कमीत कमी १० दिवसापर्यंत शेतामध्ये ट्रायकोकार्ड लावल्यानंतर रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करणे टाळावे .
7)अॅझाडिरेक्टीन १५०० पीपीएम ५०० मिली किंवा पाच टक्के निंबोळी अर्क किंवा बिव्हेरिया बॅसियाना या बुरशीयुक्त जैविक कीटकनाशकाची जमिनीत ओल व हवेत आर्द्रता असताना आठशे ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी करावी .