मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून सरकारने आणली एक खास योजना ,काय आहेत या योजनेचे फायदे जाणून घ्या सविस्तर ..

सध्या केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना सुरु करत आहेत . या योजनांच्या माध्यमातून सरकार गरजु, शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच केंद्र सरकारने आता नवीन एक योजना सुरु केली आहे. सरकारने मुलांच्या भविष्यासाठी बचत म्हणून ‘एनपीएस वात्सल्य’ योजना सुरु केली आहे.

पालकांना या योजनेअंतर्गत आपल्या पाल्याच्या उत्तर आयुष्यासाठी तरतूद म्हणून निवृत्तिवेतन खातेही उघडता येणार आहे. जुलै २०२४ मध्ये सरकारने या योजनेची सुरुवात केली होती.

आपल्या मुलाचे भविष्य सुरक्षीत करण्यासाठी या योजनेमुळे पालकांना गुंतवणूक करता येणार आहे. एनपीएस वात्सल्य योजनेत पालक ऑनलाइन माध्यमातून तसेच बँक शाखा किंवा टपाल खात्याच्या माध्यमातून खाते उघडू शकतात.

खाते उघडण्यासाठी किमान योगदान १ हजार रुपये आहे. त्यानंतर सदस्यांना वार्षिक किमान १ हजार रुपये खात्यात जमा करावे लागणार आहेत.
मुलाला वयाची १८ वर्ष पूर्ण होताच या खात्याचे रुपांतर नियमीत पेन्शन योजनेमध्ये होणार आहे. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणाद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे.

खाते कोणाला उघडता येणार?

🔰 18 वर्षांखाली ज्या मुलांचे वय आहे, ते एनपीएस वात्सल्य खाते उघडू शकता. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर आपोआप नियमित ‘एनपीएस’ खात्यात रूपांतरित होईल.

🔰 खात्यातून निवृत्तिवेतन (पेन्शन) वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावरच मिळेल.

🔰 ‘एनपीएस’ ने समभाग, कर्ज रोखे आणि जी-सेकमधील गुंतवणुकीतून अनुक्रमे १४ टक्के, ९.१ टक्के आणि ८.८ टक्के परतावा दिला आहे.

अटी आहेत तरी काय?

🔰या योजनेसाठी १८ वर्षापर्यंतची सर्व मुले पात्र असणार आहेत.
🔰 मुलेच या योजनेचे लाभार्थी असतील खाते फक्त मुलांच्या नावाने उघडली जातील,
🔰कमीत कमी १ हजार रुपये हे खाते उघडण्याची मर्यादा ही असणार आहे.
🔰 या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी कमाल मर्यादा नाही
🔰 चक्रवाढ व्याज खात्यात जमा केलेल्या पैशांवर मिळेल
🔰 ३ वर्षानंतर 25 टक्के रक्कम शिक्षण, आजार यासाठी काढता येणार आहे .
🔰 जास्तीत जास्त तीन वेळा यातील रक्कम मुलाचे वय 18 वर्ष होईपर्यंत काढता येईल
🔰या योजनेतून मुल 18 वर्षाचे होईपर्यंत बाहेर पडता येणार नाही
🔰 खात्याला ३ वर्षाच्या लॉक-इन कालावधीनंतर २५ टक्के रक्कम शिक्षण, आजार, अपंगत्वासाठी काढता येईल.
आई-वडील तसेच पालकांना अल्पवयीन मुलांच्या वाढदिवसानिमित्त तसेच इतर प्रसंगी एनपीएस वात्सल्य योजनेत गुंतवणूक करता येईल. – निर्मला सीतारामन, अर्थमंत्री

Leave a Reply