अर्थसंकल्पात शेतकरी बांधवासाठी घेण्यात आल्या दहा मोठ्या घोषणा नेमक्या कोणत्या जाणून घेऊया सविस्तर ..

आज महायुती सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला. अजित पवारांनी या अर्थसंकल्पामध्ये विविध घोषणा केल्या आहेत. दरम्यान, या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा करण्यात आली . जाणून घेऊयात या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना लाभ काय मिळणार ? त्याबाबतची माहिती.

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पात केलेल्या घोषणा?

◼️  जुलै, 2022पासून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीपोटी 15 हजार 245 कोटी 76 लाख रुपयांची मदत .

◼️  नुकसानीच्या क्षेत्राची मर्यादा २ ऐवजी ३ हेक्टर करुन राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषापेक्षा जास्त दराने मदत

◼️  नोव्हेंबर – डिसेंबर, 2023 मधील अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या 24 लाख 47 हजार शेतकऱ्यांना 2 हजार 253 कोटी रुपयांची मदत

◼️  खरीप हंगाम 2023 करिता 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ तर 1 हजार 21 महसूल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर करून विविध सवलती लागू

◼️  संपूर्ण राज्यात नुकसानीचे पंचनामे पारदर्शी आणि त्वरित होण्‍यासाठी ई-पंचनामा प्रणाली लागू

◼️  एकूण 92 लाख 43 हजार शेतकरी कुटुंबांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’ अंतर्गत 5 हजार 318 कोटी 47 लाख रुपये अनुदान

◼️ 59 लाख 57 हजार शेतकऱ्यांना ‘एक रुपयात पीक विमा योजने’ अंतर्गत 3 हजार 504 कोटी 66 लाख रुपये रक्कम अदा

◼️  2 हजार 694 शेतकरी कुटुंबांना ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजने’ अंतर्गत 52 कोटी 82 लाख रुपयांचे अनुदान वाटप

◼️  पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या 14 लाख 33 हजार शेतकऱ्यांना ‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने’ अंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम म्हणून पाच हजार १९० कोटी रुपये अदा केले, उर्वरित रकमेचे वाटप त्वरीत

◼️ नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचा 6 हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांत राबवला जाणार

◼️ मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातंर्गत 1 हजार 561 कोटी 64 लाख रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजूरी- सुमारे 9 लाख शेतकऱ्यांना लाभ

◼️ विदर्भ आणि मराठवाडयातील चौदा विपत्तीग्रस्त जिल्हयामधील केशरी शिधापत्रिकाधारक 11 लाख 85 हजार शेतकरी लाभार्थींना मे 2024 अखेर 113 कोटी 36 लाख रुपये थेट रोख रक्कम अदा

◼️ गेल्या तीन वर्षात 2 लाख 14 हजार शेती उपकरणांच्या खरेदीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्यपुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेतून 1 हजार 239 कोटी रुपये अनुदान

◼️ ‘गाव तिथं गोदाम’ या नवीन योजनेच्या पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्वातील गोदामांची दुरुस्ती

◼️ सोयाबीन ,कापूस तसेच अन्य तेलबियांच्या उत्पादकतेमध्ये वाढ आणि मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजना-सन 2024-25 मध्ये 341 कोटी रुपये निधी

◼️ खरीप व रब्बी हंगामातील कडधान्य व तेलबियांच्या नाफेडमार्फत खरेदीसाठी आधारभूत किंमतीनुसार 100 कोटी रुपयांचा फिरता निधी

◼️ कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये प्रति हेक्टरी 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे सन 2023-24 मध्ये 851 कोटी 66 लाख रुपये अनुदान

◼️ कापूस आणि कांद्याची हमीभावाने खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 200 कोटी रुपयांचा फिरता निधी

◼️ 6 लाख धान उत्पादक शेतकऱ्यांना खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये प्रति हेक्टरी 20 हजार रुपयांप्रमाणे 1 हजार 350 कोटी रुपये प्रोत्साहन रक्कम प्रदान
नोंदणीकृत दोन लाख 93 हजार दूध उत्पादकांना प्रतिलिटर 5 रुपयांप्रमाणे 223 कोटी 83 लाख रुपये अनुदान वितरीत ,राहिलेले अनुदानही त्वरित वितरीत
करणार

◼️ मागेल त्याला सौरउर्जा पंप- शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जीकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प -एकूण 8 लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार.

◼️ जुलै, 2024 पासून दूध उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याकरीता प्रतिलिटर पाच रुपयांप्रमाणे अनुदान देण्याची योजना पुढे चालू ठेवण्यात येणार

◼️ पशुसंवर्धन, पशुचारा आणि पशुखाद्य उत्पादन, दुग्धव्यवसाय, या क्षेत्रात नव उद्योजक निर्माण करण्याकरीता नवीन ‘दुग्ध व्यवसाय उद्योजकता प्रकल्प’
कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालनाला प्रोत्साहन देण्यासाठी दोन नवीन प्रकल्प.

◼️ मासळी विक्री सुविधांसाठी व मत्स्यबाजार स्थापना करण्यासाठी 50 कोटी रुपये निधी

◼️ 10 हजार हेक्टर खाजगी क्षेत्रावर अटल बांबू समृद्धी योजनेतून बांबूची लागवडीसाठी -प्रतिरोपासाठी 175 रूपये अनुदान

◼️ मोठया प्रमाणात राज्यातील पडीक जमीनीवर बांबूची लागवड – नंदुरबार जिल्ह्यात 1 लाख 20 हजार एकर क्षेत्रावर बांबूची लागवड

◼️ वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जिवीतहानी- नुकसान भरपाईच्या रकमेत 20 लाख रुपयांवरून 25 लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास 1 लाख 25 हजारावरून 5 लाख रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास 5 लाख रुपयांवरून 7लाख 50 हजार रुपये, किरकोळ जखमी झाल्यास 20 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये अशी
वाढ , शेती पिकाच्या नुकसान भरपाईकरिता देय रकमेच्या कमाल मर्यादेतही 25 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये वाढ

◼️ महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम- 155 प्रकल्पांच्या कालवे वितरण प्रणालीची सुधारणा -येत्या तीन वर्षात त्यामुळे सुमारे 4 लाख 28 हजार हेक्टर वाढीव
क्षेत्राला प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ

◼️ सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम- 108 प्रकल्पांना सुधारीत प्रशासकीय मान्यता -दोन वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित- सुमारे 3 लाख 65
हजार हेक्टर सिंचन क्षमता

◼️ विविध अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, वितरण प्रणालीतील सुधारणांसाठी नाबार्डकडून पंधरा हजार कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे अर्थसहाय्य
म्हैसाळ जिल्हा सांगली येथे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प – अंदाजित किंमत १ हजार 594 कोटी रुपये- सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील सुमारे 75 हजार शेतकरी कुटुंबांना लाभ

◼️ जनाई-शिरसाई, पुरंदर यासह सर्व शासकीय उपसा जलसिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण -४ हजार 200 कोटी रुपये स्वच्छ व हरित उर्जेचे ध्येय साध्य करण्यासाठी खर्च

◼️ वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प- नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील 3 लाख 71 हजार 277 हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ

◼️ अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त भागात वळविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने तीन हजार 200 कोटी रुपये किंमतीचा महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळावी

◼️ मार्च 2024 अखेर 49 हजार 651 कामे जलयुक्त शिवार अभियान-2 अंतर्गत पूर्ण – 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद

◼️ ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत एकूण 338 जलाशयातून 83 लाख 39 हजार 818 घनमीटर गाळ काढण्यात आला. 6 हजार शेतकऱ्यांना लाभ.

Leave a Reply