साखरदरात घसरण होत असल्याने साखर कारखाने हवालदिल,सध्या क्विंटला मिळत आहे इतका दर ?

मागील पंधरादिवसापासून साखरेच्या किमतीत घट होत आहे. त्यामुळे साखर कारखाने अडचणीत आले आहेत. मागील पंधरादिवसापासून पन्नास रुपयांची साखरदरात क्विंटलमागे घसरण झाली आहे. आता साखरेला क्विंटला ३४०० ते ३४५० रुपये इतका दर मिळत आहे.

कारखान्यांना मिळत आहे त्या दरामध्ये साखरेची विक्री करावी लागत आहे. साखर कारखान्यांनी नुकत्याच केंद्राने दिलेल्या कोट्याच्या ९० % साखरेची विक्री करावी नाही तर त्या पुढील महिन्यातील साखरेचा कोटा घटवण्याचा केंद्राकडून इशारा देण्यात आला आहे . या पार्श्‍वभूमीवर साखर विक्रीचे आव्हान कारखान्यां समोर आहे.साखरेला अपेक्षित दर मिळत नाही तसेच केंद्राचा साखर विक्रीचा दबाव कारखान्यांच्या अडचणीत भर घालत आहे.

साखरेला संक्रातीच्या दरम्यान बऱ्यापैकी मागणी होती.मात्र हळूहळू साखरेच्या मागणी व दरातही संक्रात झाल्यानंतर घट होत गेली. सध्या फेब्रुवारी महिना सुरू झाला असला तरी आणखीन उन्हाचा कडाका कुठेच नाही त्यामुळे शीतपेये किंवा आईस्क्रीम साठी साखर खरेदी होत नाही.

केंद्राने साखरेची चणचण होऊ नये त्यामुळे देशाच्या अंतर्गत बाजारपेठेत जास्त प्रमाणात कोटे देण्यास सुरुवात केली आहे. यंदा जरी उत्पादन पाच ते दहा लाख टनांनी मागील वर्षीच्या तुलनेत कमी असले तरी सध्या तरी बाजारात मुबलक साखर कोट्यामुळे साखर उपलब्ध होत आहे . पुढील कालावधी मध्ये देखील साखरेची टंचाई होणार नाही .

महाराष्ट्रातील साखर कारखाने उत्तर प्रदेशबरोबर अजूनही एक महिनाभर हंगाम सुरू ठेवण्याची शक्यता आहे,त्यामुळे गेल्या वर्षी इतकेच पुढील काळात उत्पन्न मिळेल, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे. त्यामध्ये इथेनॉलसाठी वळणाऱ्या साखरेवरही केंद्राने निर्बंध आणले आहेत.मुबलक प्रमाणात साखर उपलब्ध होण्यावर या सर्वांचा परिणाम झाला आहे.

आवश्यक तेवढी साखर पुढील दोन महिन्यांमध्ये तरी निश्चित मिळेल, असा अंदाज व्यापाऱ्यांचा आहे ,साखर खरेदीसाठी ज्या प्रमाणात स्पर्धा व्हायला पाहिजे होती तेवढी होत नाही असे साखर कारखाना प्रतिनिधींनी सांगितले.या सगळ्याचा साखरेच्या किमती न वाढण्यावर विपरित परिणाम होत आहे.

साखर कारखान्यांना जादा फटका… 

महाराष्ट्राची व उत्तर प्रदेश ची साखर ईशान्येकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाते. मात्र सध्या ही राज्ये उत्तर प्रदेशातील साखरेला अधिक पसंती दाखवत आहेत , उत्तर प्रदेशातील साखर कारखान्यांपेक्षा महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना ईशान्येकडे साखर पाठवणे महाग पडत आहे .

महाराष्ट्रापेक्षा उत्तरेकडील साखर ईशान्येकडील राज्येही स्वस्त पडत असल्यामुळे या साखरेला जादा प्राधान्य देत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रामधील साखर विक्री ही कासवगतीने होत आहे असे साखर कारखाना सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *