krishi salla: सध्याच्या हवामानात केळी आणि आंबा पिकाची अशी घ्या काळजी

krishi salla:प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता लक्षात घेता पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. दरम्यान केळी आणि आंबा पिकाची कशी काळजी घ्यावी याबद्दलही त्यांनी सांगितले आहे.

केळी बागेचे व्यवस्थापन:
केळी बागेचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी बागेस सकाळी पाणी द्यावे. केळी बागेस 00:52:34 विद्राव्य खताची 15 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

केळी बागेत करपा (सिगाटोका) रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपिकोनॅझोल 10% ईसी 10 मिली किंवा मेटीराम 55% + पायरॅक्लोस्ट्रोबीन 5% डब्ल्यू जी 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

केळी बागेत ‍तण व्यवस्थापन करावे व बोधांना माती लावावी.

आंबा बागेचे व्यवस्थापन:
आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. आंबा बाग सध्या फुलधारण अवस्थेत आहे, बागेत परागीकरण व्यवस्थीत होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या किटकनाशकाची फवारणी करू नये.

द्राक्षसल्ला:
किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत रात्री सिंचन करावे. खोडाभोवती किंवा बागेत सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे. किमान तापमानात झालेल्या घटीमूळे द्राक्ष बागेत पिंक बेरीची समस्या होऊ नये म्हणून व उबदार पणा रहावा यासाठी द्राक्ष घड पेपरने किंवा पिशव्याने झाकून घ्यावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *