अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत ट्रॅक्टर खरेदी सवलत योजनेस येत्या दसऱ्यापासून सुरवात होणार..

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या माध्यमातून आजपर्यंत 70 हजार व्यावसायिक तयार झालेले आहेत.  राज्यामध्ये सध्या 70 हजार लाभार्थ्यांना 5 हजार 140 कोटी रुपयांचे कर्ज विविध बँकांनी व्यवसाय करता वितरित केले आहे.  यापैकी 58 हजारांपेक्षा जास्त लाभार्थ्यांना महामंडळाने 567 कोटी रुपयांपेक्षा अधिकच व्याज परतावा केला आहे.  प्रामुख्याने शेती पूरक व्यवसायाला प्राधान्य देण्यात येत आहे.  याच पार्श्वभूमीवर ट्रॅक्टर खरेदी योजना पुन्हा सुरू करण्यात येत असून दसऱ्यापासून त्याची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.  महामंडळामार्फत गेल्या वर्षांमध्ये राबवण्यात येत असलेल्या योजने संदर्भात माहिती देताना मंत्रिमंडळाच्या विधिमंडळ वार्ताहर कक्षामध्ये आयोजित पत्रकार परिषद मध्ये श्री पाटील हे बोलत होते.

श्री पाटील म्हणाले की महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत स्थगिती असलेले ट्रॅक्टर खरेदी प्रकरणे पुन्हा सुरू करण्याची कार्यवाही केली आहे.  येत्या दसऱ्यापासून ट्रॅक्टर खरेदी सवलती ना सुरुवात होणार आहे . यासाठी महिंद्रा आणि स्टॉक टर्बो या दोन कंपन्यांसोबत समस्या करार (एमओयू) करण्यात येणार आहे.मराठा समाजाच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या माध्यमातून दहा हजार ते दोन लाख रुपयांच्या मर्यादेतील लघु कर्ज व्याज परतावा योजना व शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना अशा नवीन योजना प्रस्तावित करण्यात आलेले आहेत.

महामंडळाच्या योजनेची जनजागृती राज्यामध्ये गाव पातळीपर्यंत करण्याच्या उद्देशाने जिल्हा निहाय दौरे मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले असून राज्यातील विविध तालुक्यांमध्ये या माध्यमातून महामंडळाच्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे.  ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज प्रकरणे सुरू करून त्याचा लाभ गरीब शेतकऱ्यांपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ,यांच्या समवेत पत्रव्यवहार करून ही बाब उपसमितीमध्ये देखील मांडली ही बाब महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मांडून महामंडळाच्या लाभार्थ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर विशेष सवलत मिळावी.  यासाठी त्यांनी प्रयत्न करून ट्रॅक्टर प्रकरणी सुरू करण्याकरिता कार्यवाही केली असल्याचे सांगितले.

लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने महामंडळाच्या योजनेमध्ये करण्यात आलेले बदल

🔰 यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना अंतर्गत कर्ज मर्यादा रुपये दहा लाखावरून रुपये पंधरा लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे.

🔰 तीन लाख रुपयांच्या मर्यादित करण्यात येणाऱ्या व्याज पर्तव्याची मर्यादा 4.5 लाख रुपयांपर्यंत वाढवून कर्ज कालावधी पाच वर्ष सात वर्ष पर्यंत वाढविला आहे.

🔰 महामंडळाच्या योजनेअंतर्गत सर्वांकरिता वयोमर्यादेची अट साठ वर्षे पर्यंत वाढविण्यात आले आहे.

शासन आपल्या दारी प्रमाणे लाभार्थी संवाद मेळावे आयोजित करून महामंडळ आपल्या दारी ची कार्यवाही सुरू केली असून आत्तापर्यंत राज्यांमध्ये तीन संवाद मिळावे . एकूण 11 जिल्ह्यांमध्ये दौरे करण्यात आलेले आहेत.  लाभार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने बँक ऑफ इंडिया समवेत समस्या करार केला आहे . त्याचबरोबर पुढील कालावधीमध्ये महामंडळ राज्यातील सर्व सीएससी सेंटर बरोबर सामस्य करार करण्यात येणार असून लाभार्थ्यांना महामंडळाची योजनेअंतर्गत ऑनलाइन स्वरूपात सहकार्य सीएससी सेंटरच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया महामंडळाच्यास्तराव सुरू आहे.  भविष्यामध्ये महामंडळाच्या माध्यमातून अधिक संख्येने मराठा तरुण उद्योजक तयार करण्याचे ध्येय असल्याचेही श्री पाटील यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *