डाळींब विकणे आहे.

☘️ आमच्याकडे उत्तम प्रतीचे डाळींब विकणे आहे. ☘️ संपूर्ण माल १० टन आहे. ☘️ साईज १००+४०० आहे.

Nafed onion : लासलगाव-पिंपळगावात नाफेडच्या कांदा चाळींना मिळणार नवे रूप…

Nafed onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नाफेडतर्फे लासलगाव आणि पिंपळगाव या दोन्ही ठिकाणी जुन्या कांदा गोडाऊनच्या दुरुस्तीबरोबरच नव्या चाळी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी एकूण १२.२१ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सध्या टेंडर प्रक्रिया सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून नाफेडच्या कांदा गोडाऊन बंद अवस्थेत पडून होते. परिणामी, शेतकऱ्यांना कांद्याची साठवणूक […]

Heat wave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट कायम; पुढच्या आठवड्यात कसे असेल हवामान?

Heat wave : महाराष्ट्रासह देशातील विविध भागांत मागील २४ तासांत तापमानात चढ-उतार दिसून आले. विदर्भ आणि मराठवाड्यात दिवसाचे तापमान सामान्यपेक्षा थोडे अधिक असून हवामान उष्ण आणि दमट राहिले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांत उष्णतेची लाट जाणवत आहे. तर देशाच्या ईशान्य भागात काही ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे. मागील २४ तासांत महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान […]

Fisheries : ट्रम्प करामुळे आंध्रातील मत्स्यव्यवसाय डबघाईला; शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले..

Fisheries : अमेरिकेने भारतीय कोळंबी निर्यातीवर टेरिफ वाढवल्यानंतर आंध्रप्रदेशातील मत्स्यव्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. कोळंबी उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून बाजारातील मागणीही कमी झाली आहे. परिणामी, हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत. अमेरिकेने अलीकडेच भारतीय कोळंबीवर टेरिफ १० टक्क्यांवरून २६ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला. याचा मोठा फटका भारताच्या कोट्यवधी रुपयांच्या समुद्री उत्पादने निर्यातीवर बसला आहे. यामध्ये […]

Wheat harvesting : राज्यात गव्हाची काढणी पूर्ण; देशात कुठल्या पिकाची कशी सुरू आहे काढणी? जाणून घ्या…

Wheat harvesting : भारतामध्ये रब्बी हंगाम 2024-25 दरम्यान गहू, तांदूळ आणि डाळींसारख्या मुख्य पिकांची लागवड चांगल्या प्रमाणात झाली असून काही राज्यांमध्ये या पिकांची काढणीही वेगाने सुरू आहे. कृषी मंत्रालयाच्या ४ एप्रिल २०२५ च्या अहवालानुसार सध्याच्या स्थितीचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. गव्हाची लागवड ३२६.०६ लाख हेक्टर क्षेत्रावर झाली असून ही मागील सरासरीपेक्षा अधिक आहे. देशात सध्या गव्हाच्या […]

Todays Kanda bajarbhav : आज लासलगावला कांदा बाजारभाव कसा मिळाला? जाणून घ्या..

Todays Kanda bajarbhav

Todays Kanda bajarbhav : राज्यात उन्हाळी कांद्याला सरासरी दर 19 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात 1075 रुपये प्रतिक्विंटल मिळाला, जो काल म्हणजे 18 एप्रिलच्या 1030 रुपये सरासरी दराच्या तुलनेत 45 रुपयांनी अधिक होता. तर लाल कांद्याला 19 एप्रिल रोजी सरासरी दर 1020 रुपये मिळाला, जो मागील दिवसाच्या तुलनेत जवळपास स्थिर आहे. नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या […]

Smart farming : राज्यात ‘स्मार्ट शेती’साठी एआयचा वापराबद्दल लवकरच धोरण मसुदा ठरणार…

Smart farming : महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने राज्यातील शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. मंत्रालयात नुकतीच एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत कृषी क्षेत्रातील विविध भागधारक, तज्ज्ञ, नामांकित उद्योगसमूह आणि स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचा उद्देश राज्यात एआयचा शेतीमध्ये कसा प्रभावी वापर करता येईल, यावर […]

Maize and Gram market prices : या सप्ताहात मका आणि हरभऱ्याचे बाजारभाव असे राहिले..

Maize and Gram market prices

Maize and Gram market prices : स्मार्ट प्रकल्प अंतर्गत सादर करण्यात आलेल्या साप्ताहिक बाजारभाव अहवालानुसार, महाराष्ट्रातील प्रमुख कृषी बाजारपेठांमध्ये मका आणि हरभरा या पिकांच्या दरात अलीकडील आठवड्यात चढ-उताराचे चित्र दिसून आले. शेतकऱ्यांना विक्रीसाठी अनुकूल वेळ निश्चित करताना या बदलत्या भावाचा विचार करावा लागणार आहे. मक्याच्या किमतींमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून किंचित घसरण दिसत असून १३ एप्रिल […]

Onion purchase : नाफेडकडून कांदा खरेदी कधीपर्यंत सुरू होणार? काय आहेत अटी…

Onion purchase : नाफेडने २०२५ च्या रब्बी हंगामासाठी महाराष्ट्रातील कांदा खरेदी सुरू करण्याची तयारी केली असून, यंदा राज्यातून सुमारे १.५० लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी नाफेडने सहकारी संस्थांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत नाफेडच्या सदस्य संस्था, सहकारी सोसायट्या व प्राथमिक कृषी पतसंस्था यांना प्राधान्य दिले आहे. नाफेडच्या खरेदीच्या […]

Devendra Fadnvis : राज्याच्या कृषीमंत्र्यांची केली मुख्यमंत्र्यांनी कोंडी; हे अधिकार काढून घेतले…

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या अलीकडील राजकीय भूमिकांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता त्यांच्यावर सरकारमधूनच दबाव वाढला आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नुकतेच कृषी खात्यातील बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेतले असून, कृषी आयुक्तांच्या बदल्याचाही अधिकार मंत्र्यांकडून काढून घेतला आहे. त्यामुळे कृषी खात्यातील बदल्यांवर नियंत्रण असलेले सर्व अधिकार मंत्र्यांकडून काढून घेण्यात आले आहेत. या प्रकारामुळे […]