wheat market : देशात गव्हाचा मुबलक साठा, खुल्या बाजारात विक्रीची गरज नाही…

केंद्र सरकारने देशातील गव्हाच्या स्थितीबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे की, सध्याच्या परिस्थितीत सरकारला खुल्या बाजारात गहू विकण्याची कोणतीही आवश्यकता नाही. देशात गव्हाचा पुरेसा साठा उपलब्ध असून, त्याच्या किमतीही स्थिर पातळीवर आहेत, असे सरकारने म्हटले आहे. या निर्णयामुळे गव्हाच्या बाजारातील स्थिती अधिक स्पष्ट झाली आहे. विक्रमी गव्हाचे उत्पादन […]
Dam water storage: राज्यातील धरणात आजपर्यंत किती पाणीसाठा? कुठली धरणे ओव्हर फ्लो…

Dam water storage : महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात पावसामुळे चांगली भर पडली असून, २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंतची जलसंपदा विभागाची आकडेवारी पाहता अनेक मोठ्या धरणांमध्ये ७० ते ९० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा झाला आहे. काही ठिकाणी धरण ओव्हरफ्लोही झाले आहेत. उत्तर अहमदनगरमधील भंडारदरा धरण ७८ टक्के भरले असून, ८३५ क्युसेक्सने प्रवरा नदीत विसर्ग सुरू आहे. निळवंडे […]
Shivarastha for farmers : जेव्हा वर्षानुवर्षे बंद शीवरस्ता शेतकऱ्यांसाठी होतो पुन्हा खुला…

Shivarastha for farmers : सांगली जिल्ह्यातील आळते (ता. तासगाव) आणि कार्वे (ता. खानापूर) या दोन गावामधील अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने बंद असलेला शीवरस्ता विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या पुढाकाराने व दोन्ही गावच्या सरपंचांच्या सहकार्याने खुला करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी या ठिकाणी भेट देऊन समाधान व्यक्त केले. […]
Maharashtra weather update: राज्यात पावसात होणार वाढ, शेतकऱ्यांनी अशी काळजी घ्यावी…

Maharashtra weather update: भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (२५ जुलै) सकाळी प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये आगामी दिवसांत जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाडा भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून (२५ जुलै) पुढील दोन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, मुंबई, रायगड, […]
Good news : आनंदाची बातमी: कांदा-द्राक्ष शेतकऱ्यांना ब्रिटनच्या माध्यमातून नवी बाजारपेठ मिळणार…

Good news : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान सर कीर स्टार्मर यांची काल लंडनमध्ये महत्त्वाची भेट झाली. या बैठकीत भारत आणि ब्रिटन यांच्यात सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर स्वाक्षरी झाली. या ऐतिहासिक करारामुळे दोन्ही देशांमधील व्यापार-संधी वाढणार असून, कृषीमालाच्या निर्यातीसाठी नव्या बाजारपेठा खुले होणार आहेत. या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये पाठवण्यात येणाऱ्या बहुतांश कृषी […]