राज्यातील गाळप हंगाम आता शेवटच्या टप्प्यात ,किती झाले साखर उत्पादन जाणून घ्या सविस्तर ..

आता राज्यामधील गाळप हंगाम हा शेवटच्या टप्प्यात आला आहे व अखेर राज्यातील जवळपास ९० टक्के साखर कारखान्यांनी आपले ११ एप्रिल ला गाळप थांबवले आहे. तर उर्वरित साखर कारखाने अद्यापही सुरू आहेत. कारखान्यांनी गाळप थांबवल्यामुळे उसतोड मजुरांची घरी जाण्याची घाई सुरू झाली असून काहीजण घरी पोहोचले आहेत. तर उसाची उपलब्धता ज्या भागात आहे अशा भागांमधील साखर कारखान्यांचे गाळप आणखीन सुरू आहे.

यावर्षी राज्यामध्ये २०७ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. त्यापैकी खासगी १०४ साखर कारखाने व सहकारी १०३ साखर कारखाने आहेत. आता २०७ साखर कारखान्यांपैकी १८५ साखर कारखान्यांनी आपले गाळप थांबवले आहे.तर राज्यातील २२ साखर कारखान्यांचे गाळप आणखीन सुरू आहे.

आत्तापर्यंत राज्यामध्ये १ हजार ६३ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप झाले आहे व राज्यामध्ये १ हजार ८९ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. तर सरासरी १०.२५ टक्के एवढा आत्तापर्यंत साखर उतारा झाला आहे.कोल्हापूर विभागात सर्वांत जास्त उसाचे गाळप आणि साखर उत्पादन झाले आहे या विभागामध्ये १४० लाख मेट्रीक टन उस गाळप झाला आहे.

२३४ लाख मेट्रीक टन उसाचे गाळप हे पुणे विभागात झाले असून साखरेचे उत्पादन २४६ लाख क्विंटल झाले आहे.नागपूर विभागात सर्वांत कमी उसाचे गाळप झाले आहे व या ठिकाणी ४ लाख मेट्रीक टन उस गाळप झाला आहे . केवळ २ लाख क्विंटल साखर उत्पादन हे नागपूर विभागात झाले आहे. दरम्यान, राज्यामध्ये सर्वांत जास्त साखर उतारा हा कोल्हापूर जिल्ह्यातील आहे व येथे तब्बल ११.५८ टक्के साखर उतारा आला आहे.

Leave a Reply