कांदा निर्यात शुल्कमध्ये कपात केल्यानंतर कांदा निर्यातीला वेग येणार ,आता किती मिळतोय कांद्याला दर,जाणून घ्या सविस्तर ..

निर्यातशुल्क निम्म्याने कमी झाल्यामुळे तसेच किमान निर्यातमूल्याच्या बंधनातून मुक्तता मिळाल्यामुळे शनिवारी जिल्ह्यातील घाऊक बाजारामध्ये कांद्याचे प्रतिक्विंटलचे दर 500 रुपयांनी वाढले . शनिवारी चांगल्या प्रतिच्या कांद्याला लासलगाव बाजारामध्ये सरासरी 4 हजार 700 रुपये दर मिळाले. तर कांदा निर्यातीला कांदा निर्यात शुल्कमध्ये कपात केल्यानंतर वेग येणार आहे. कांदा निर्यातदारांनी दिलेल्या माहितीनुसार ,श्रीलंका, गल्फ कंट्री, मलेशिया ,बांग्लादेश, या देशातून कांद्याच्या मागणीला सुरुवात झाली आहे.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये कांद्याचे भाव ३ हजार रुपयांवर गेल्याने सरकारने निर्यातबंदी लागू करण्यात आली होती . कांदा उत्पादकांच्या भागात लोकसभा निवडणुकीत मतदानावेळी सरकारने निर्यात बंदी उठवली होती. मात्र , प्रतिमेट्रिक टन 550 डॉलर किमान निर्यातमूल्य आणि 40 टक्के निर्यातशुल्क यामुळे निर्यातीतील अडसर कायम होते.किमान निर्यात मूल्याचे बंधन हटवत 40 टक्के निर्यातशुल्क 20 टक्क्यांवर केंद्र सरकारने आणले. जिल्ह्यातील घाऊक बाजारावर याचा परिणाम झाला.

शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना जास्त लाभ होणार..

मे महिन्यामध्ये चाळीत ठेवलेला कांदा पावसात बराचसा खराब झाला. त्यामुळे कांदा उत्पादकांकडे फारसा कांदा नाही. व्यापारी वर्गाची साठवणुकीची क्षमता जास्त आहे. त्यामुळे या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांना जास्त होणार आहे.

कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण

कांद्याची आवक शनिवारी लासलगाव बाजार समितीत ५ हजार क्विटल इतकी झाली. त्यास सरासरी ४ हजार सातशे रुपये भाव मिळाला .शुक्रवारी याच बाजारामध्ये कांद्याला सरासरी 4 हजार 200 रुपये क्विटल भाव मिळाला होता. तर आता कांदा निर्यातीलाही कांदा निर्यात मूल्य आणि निर्यात शुल्कमध्ये बदल केल्यानंतर वेग येणार आहे.श्रीलंका, ,गल्फ कंट्री, मलेशिया, बांग्लादेश या देशातून कांद्याच्या मागणीला सुरुवात झाल्याचे कांदा निर्यातदारांनी म्हटल्याने कांद्याचे दर आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे . त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply