
Kanda bajar bhav : मागच्या आठवड्याप्रमाणेच या आठवड्यातही राज्यात कांदा दरवाढ सुरूच राहिली आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून हा दरवाढीचा कल जूनच्या दुसऱ्या आठवड्यातही कायम राहिला. महाराष्ट्रात कांद्याच्या दरात ९ ते १४ जून २०२५ या दुसऱ्या आठवड्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पहिल्या आठवड्याशी (१ ते ८ जून) तुलना करता राज्यातील सरासरी दर तब्बल १२१ रुपयेनी म्हणजेच सुमारे १०.९२ टक्क्यांनी वाढले आहेत. पहिल्या आठवड्यात कांद्याचा सरासरी दर ११०९ रुपये प्रतिक्विंटल होता, जो दुसऱ्या आठवड्यात १२४३ रुपयांवर पोहोचला आहे.
या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात दर १३३२ रुपयांवरून १५०९ रुपयांपर्यंत पोहोचला. म्हणजेच सुमारे १७७ रुपयांची (१३.२९ टक्के) वाढ झाली. पुण्यात २४३ रुपयांची (२०.५९ टक्के) वाढ झाली. या आठवड्यात पुण्यातील दर ११८० रुपयांवरून १४२३ रुपयांवर पोहोचले.
अहिल्यानगर (छत्रपती संभाजीनगर) जिल्ह्यात दर १९५ रुपयांनी (१९.६२ टक्के), सोलापूरमध्ये १२५ रुपयांनी (१२.७९ टक्के), धाराशिवमध्ये २८८ रुपयांनी (३१.२ टक्के), जळगावमध्ये ५८ रुपयांनी (७.२५ टक्के), सांगलीमध्ये २४५ रुपयांनी (२३.७६ टक्के), साताऱ्यात १११ रुपयांनी (९.७४ टक्के) आणि कोल्हापूरमध्ये १०४ रुपयांनी (९.४७ टक्के) दरवाढ झाली आहे.
या सर्व जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक वाढ धुळे जिल्ह्यात नोंदवली गेली. धुळ्यात दर ९९९ रुपयांवरून थेट १३८७ रुपयांपर्यंत गेले, म्हणजेच ३८८ रुपयांची वाढ झाली आहे, जी सुमारे ३८.८४ टक्के इतकी आहे. ही वाढ इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.
दरवाढीचे मुख्य कारण म्हणजे मागील आठवड्यात बाजारात आलेल्या कांद्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात आवक काही प्रमाणात घटलेली दिसते, तसेच गुणवत्तेच्या कांद्याला मागणी अधिक आहे. पावसाळ्याच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांकडून साठवणुकीसाठी कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे भाव चढे राहण्याची शक्यता आहे.
कांदा दरामध्ये झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ही दरवाढ सातत्याने होत असल्याने आगामी आठवड्यातही भाव वाढू शकतात. त्यामुळे बाजारातील घडामोडींवर शेतकऱ्यांनी बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
(टिप: वरील माहिती कॉपीराईट प्रोटेक्टेड असून कुणीही कुठल्याही स्वरूपात किंवा माध्यमांत उपयोग केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)