भंडारा जिल्ह्यातील धान हे प्रमुख पीक आहे . धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी धानाला बोनस देण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन सातत्याने काम करीत आहे . त्यामुळे नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाला बोनस जाहीर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केली.
शासन आपल्या दारी अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रम चैतन्य पोलीस मैदान भंडारा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही घोषणा केली . यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री विजयकुमार गावित खासदार सुनील मेंढे आमदार नरेंद्रभोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, माजी मंत्री परिणय फुके, माजी खासदार शिशुपाल पटले, मधुकर कुकडे, माजी आमदार नानाभाऊ पंचबुद्धे, चरण वाघमारे, विशेष पोलीस महानिरिक्षक छेरिंग दोरजे, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर, मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कुर्तकोटी, पोलीस अधीक्षक लोहित मतानी उपस्थित होते.
धान हे जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे . धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी धनाला बोनस जाहीर करावा अशी विनंती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणातून केली होती. त्यानुसार नागपूर अधिवेशनात बोनस जाहीर करण्याची गवाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली . जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे धान जलद गतीने खरेदी होणे आवश्यक आहे.
सध्या शेतकरी पिक पाहणी कार्यक्रम राबवला जात आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता यावी. त्यासाठी भंडारा जिल्ह्यात पिक पाहणीच्या कार्यक्रमास 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात येत असल्याची माहिती देखील यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. समृद्धी महामार्गाचे भंडारा, गोंदिया, गडचिरोली पर्यंत विस्तार करण्यात येत आहे. या मार्गाच्या डीपीआरचे काम गतीने होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्वसामान्य शेतकरी कष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामे केली जात आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आपण केवळ एक रुपया भरून पिक विमा चा लाभ देण्याची योजना सुरू केली . लाखो शेतकऱ्यांच्या पिकाला या योजनेने संरक्षण दिले प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजना सुरू केली केंद्र शासनाने 6000 आणि राज्य शासनाच्या योजनेचे 6000 असे 12 हजार रुपये राज्यातील शेतकऱ्यांना दिले जात आहेत अशा प्रकारची योजना राबवणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.












