
ज्या शेतकऱ्यांना काही कारणात्सव ई-पीक पाहणी करता आली नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी हि चांगली संधी चालून आली आहे.आता ई-पीक पाहणी ची २३ सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत असून ई-पीक पाहणी इंटरनेटशिवाय देखील करता येणार आहे. आता (ता. १५) रविवारी संपणाऱ्या ई-पीक पाहणीला ८ दिवसांची मुदत वाढ दिली आहे .
खरीप हंगाम २०२४-२५ मधील पीकपाहणी नोंदवण्यासाठी दि. १ ऑगस्टपासून सुरुवात महसूल विभागाने केली होती. परंतु सततच्या वीज पुरवठ्यासह तांत्रिक अडचणीमुळे ,शासकीय सुट्ट्या, अवकाळी पाऊस, या अनेक करण्यामुळे शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी करता आली नाही. त्यातच १५ सप्टेंबर ई-पिक पाहणी करण्याची शेवट ची तारीख होती. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता होती. ई-पीक पाहणी इंटरनेटशिवाय देखील करता येणार आहे.
आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांना संधी मिळाली आहे. राज्य शासनाने शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणीच्या नोंदणीसाठी २३ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंद केली नाही,त्यांना आता ई-पीक पाहणी करता येणार आहे.
तसेच , शासनाने पीक पाहणीची मुदतवाढ तलाठी स्तरावर देखील देण्याचा निर्णय घेतला आहे. आता तलाठी स्तरावरील ई-पीक पाहणी तपासणीची मुदतीत देखील वाढ केली आहे . आता २४ सप्टेंबर ते २३ ऑक्टोंबर या कालावधीत सहाय्यक आणि तलाठी हे देखील पीकपाहणी करू शकतील.
इंटरनेटशिवाय पीकपाहणी
खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये नाशिक विभागात १५ लाख ४८ हजार ६२२ हेक्टर इतक्या क्षेत्रावरील दि. १३ सप्टेंबरपर्यंत ई-पीकपाहणी पूर्ण झाली आहे. दरम्यान सोळा लाख ४७ हजार ५६ हेक्टर क्षेत्रावर ई पीकपाहणीची नोंद अजूनही झालेली नाही . त्यावरून ई-पीकपाहणी ॲपद्वारे शेतकऱ्यांनी पीकपाहणी नोंदणी करावी असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी केले आहे. त्याचबरोबर ई-पीकपाहणी करण्यामध्ये काही समस्या आल्यास (०२०) २५७१२७१२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच जेथे इंटरनेट सुविधा नसेल , त्याठिकाणी सुद्धा पीकपाहणी नोंदवण्यास मदत होणार आहे.