राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज,कुठे रेड अलर्ट तर ऑरेंज अलर्ट जाणून घ्या सविस्तर ..

हवामान विभागाने राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. नाशिक , पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे . तसेच कोकणातील सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच मध्य महाराष्ट्रातील सातारा, नगर ,कोल्हापूर, आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.पुणे, रायगड ,धुळे, नंदूरबार, आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

२३ सप्टेंबरला माॅन्सूनने राजस्थान आणि गुजरातमधून माघार घेतली होती तर आणखी काही भागातून २४ सप्टेंबरलालाही माॅन्सून परतला होता. परंतु २५ सप्टेंबर आणि २६ सप्टेंबरला माॅन्सूनचा प्रवास थबकला होता. माॅन्सून आजही एकाच जागेवर होता.

तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीगर, परभणी, हिंगोली ,जालना,आणि धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. तसेच तसेच हवामान विभागाने विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर , अमरावती, वाशीम, यवतमाळ , वर्धा, बुलडाणा, अकोला,आणि गडचिरोली या जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज दिला .

शुक्रवारी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला तसेच कोकणातील रत्नागिरी ,रायगड, आणि ठाणे, मध्य महाराष्ट्रातील जळगाव ,पुणे, सातारा जिल्ह्यात तसेच विदर्भातील बुलडाणा,वाशीम, यवमाळ, वर्धा, नागपूर, अकोला, अमरावती, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply