
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी लसणाच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. भुवनेश्वरच्या बाजारात लसणाचे दर हे 400 रुपये किलोवर पोचले आहेत. . लसणाच्या पिकाचे अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे लसणाच्या दरात वाढ होत असताना दिसत आहे. किलोमागे 400 रुपयांवर लसणाचा दर पोहोचला आहे. लसणाच्या दरात एवढी वाढ का होत आहे. तसेच दर कमी होणार का? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
लसणाच्या दरात वाढीचे कारण काय?
गेल्या काही आठवड्यामध्ये लसणाच्या दरात वाढ होत आहे. लसणाचे भाव 400 रुपये किलोवर भुवनेश्वरच्या बाजारात पोहोचला होता. अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे खराब हवामानामुळे मोठे नुकसान झाले आहे.हेच प्रमुख कारण लसणाच्या भावात वाढ होण्यामागेचे . पिकाचे नुकसान झाल्यामुळे नवीन पिकाची लागवड करण्यास वेळ लागला. त्यामुळे नवीन लसूण पिकाची आवक होण्यास वेळ लागत आहे. नवीन लसूण पिकाची आवक अजून झाली त्यामुळे भाव वाढत आहेत.
कमी होतील का लसणाचे दर ?
लसणाची सर्वाधिक लागवड ही मध्य प्रदेशामध्ये होते . परंतु हवामान खराब असल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे नवीन लसूण पीक येण्यास उशीर होत आहे. दरम्यान, लसणाचे पीक बाजारात आल्यावर लसणाच्या दरात घट होईल असा अंदाज आहे. नवीन लसणाची आवक झाल्यानंतर भावात लक्षणीय घट होईल.असे मत बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले .
सरासरी 32 लाख टन लसूण भारतात पिकतो..
सुमारे 32.7 लाख टन लसणाचे उत्पादन हे भारतात होते. परंतु , चीनमध्ये लसणाच्या उत्पादनात घट होऊनही देखील ते जगात पहिल्या क्रमांकावर आहे. सुमारे 2 ते 25 दशलक्ष टन लसणाचे उत्पादन चीनमध्ये दरवर्षी केले जाते, लसणाचा वापर दोन्ही देशांमध्ये देशांतर्गत केला जातो.
जागतिक बाजारामध्ये भारतातील लसणाचे दर काय आहेत?
चीनच्या लसूणपेक्षा भारतातील लसूण आकाराने किंचित लहान आहे. चीनच्या लसण्यापेक्षा भारतीय लसणाचा जागतिक बाजारामध्ये दर खूपच कमी आहे.चिनी लसणाची किंमत जागतिक बाजारपेठेत 1250 डॉलर प्रति टन आहे, तर भारतीय लसणाची जागतिक बाजारपेठेत किंमत 450 ते 1000 डॉलर प्रति टन आहे. त्यामुळे भारत गरीब ते श्रीमंत देशांच्या गरजेनुसार लसणाचा दर्जा देण्यास सक्षम आहे. बहुतांशी अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये चिनी लसणाची मागणी आहे, तर भारत मलेशिया, थायलंड, नेपाळ आणि व्हिएतनाममध्ये मोठ्या प्रमाणावर लसूण निर्यात करतो.