महाडीबीटीवर जवळपास इतक्या शेतकऱ्यांची फवारणी पंप योजनेसाठी लॉटरी पद्धतीने निवड..

एकात्मिक कापूस, सोयाबीन व तेलबिया उत्पादनात वाढ व्हावी व मुल्यसाखळी विकास व्हावा यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप योजनेची घोषणा केली आहे. १०० टक्के अनुदानावर म्हणजे मोफत फवारणी पंप या योजने मध्ये पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. लॉटरीद्वारे आत्तापर्यंत महाडीबीटी पोर्टलवर निवड झालेल्या शेतकऱ्यांची संख्या ही जवळपास दोन लाखांच्या जवळपास पोहचली आहे . त्यामुळे या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मोफत फवारणी पंप मिळणार आहे.

दरम्यान, राज्य शासनाकडून सोयाबीन मुल्यसाखळीसाठी १ लाख ३० हजार ३८ व कापूस मुल्यसाखळीसाठी १ लाख ६ हजार ३८९ असे मिळून एकूण २ लाख ३६ हजार ४२७ शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाच्या योजनेची घोषणा करण्यात आली होती . तर यासाठी कापूस आणि सोयाबीन मुल्यसाखळीमध्ये एकूण ४ लाख ९४ हजार १०३ शेतकऱ्यांना अर्ज करण्यात आले होते . तर यातून महाडीबीटी पोर्टलवर लॉटरीद्वारे १ लाख ९१ हजार १६९ शेतकऱ्यांची निवड झाली आहे.

महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून या बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपाचा पुरवठा करण्यात येणार आहे . तसेच शासन या पंपाची ३ हजार ४२५ रूपये प्रमाणे खरेदी करणार आहे. तर या पंपाचा पुरवठा क्षेत्रीय स्तरावर महाराष्ट्र कृषी विकास महामंडळा कडून करण्यात येणार आहे . यासाठी सोडतीत ज्या शेतकऱ्यांचे नाव आले आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषी अधिकाऱ्याशी अथवा कृषी सहाय्यकाला संपर्क साधायचा आहे .

क्षेत्रीय स्तरावर फवारणी पंप अजून पोहोचले नसून लवकरच शेतकऱ्यांना पंप मिळणार असल्याचे महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडून सांगण्यात आलं आहे. तर फवारणी पंप योजनेच्या यादीमध्ये सांगली, कोल्हापूर ,सातारा, पुणे,मधील एकाही शेतकऱ्यांचे नाव नाहीत, फक्त हि योजना विधानसभेच्या निवडणुकीपुरती असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

Leave a Reply