महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार बँकेला जोडलेल्या शेतकऱ्यांना मिळाला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ,वाचा सविस्तर ..

राज्य सरकारकडून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील आधार बँकेला जोडलेल्या ११ हजार ८३६ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा लाभ देण्यात आल्याची  माहिती राज्याचे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी दिली.

४६ कोटी ७० लाख रुपये ही एकूण रक्कम असून, सर्वाधिक लाभ घेणारे यवतमाळ जिल्ह्यातील ८२९ शेतकरी आहेत. २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जाहीर केली आहे. 

५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देण्याचे जाहीर करण्यात आले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार संलग्न बैंक खाते बंधनकारक करण्यात आले होते.परंतु , ऑगस्ट शेवटी ३३ हजार ३५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नसल्याचे आढळले त्यामुळे प्रोत्साहनपर लाभ देता येत नव्हता. त्यासाठी राज्य सरकारने १२ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर अशी मुदत वाढवली होती .

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी..

या योजनेंर्गत ही मुदत संपल्यानंतर योजनेमध्ये प्रोत्साहनपर लाभ ११ हजार ८३६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ४६ कोटी ७० लाख रक्कम राज्य सरकारकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. यामध्ये ८२९ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ३ कोटी ५२ लाख, नाशिक जिल्ह्यातील ७१३ शेतकऱ्यांना ३ कोटी ५४ लाख तर जळगाव जिल्ह्यातील ७२९ शेतकऱ्यांना ३ कोटी ७ लाख रकमेचा लाभ देण्यात आला आहे.

५३१० कोटींचा लाभ.. 
आधार प्रमाणीकरण करण्यापूर्वी जे शेतकरी मृत झाले आहेत, योजनेच्या पोर्टलवर अशा शेतकऱ्यांच्या वारसांची नावे समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेनंतर आधार प्रमाणीकरण व योजनेचा लाभ देण्याची कार्यवाही केली जाईल .

या योजनेमध्ये २०१७-१८, २०१८-१९, २२०१९-२० २०१९-२० या या तीन वर्षांमध्ये कोणत्याही दोन वर्षांत बँकेकडून पीक कर्जाची उचल करून नियमित परतफेड केलेली आहे, अशा एकूण १४ लाख ५० हजार शेतकऱ्यांना आजपर्यंत एकूण ५ हजार ३१० कोटी रकमेचा लाभ दिला आहे , असेही तावरे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *