हवामान खात्याचा अंदाज ,मान्सून या दिवशी राज्यात होणार दाखल.

mansoon

मान्सून काही दिवसात महाराष्ट्रात येणार असल्यामुळे शेतीच्या कामाची शेतकऱ्यांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. यंदा मान्सून राज्यात वेळेवर येण्यास कोणतीही अडचण येणार नाही.

बळीराजाला सुखवणाऱ्या पावसाने मात्र यावर्षी अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. गेल्या काही महिन्यात शेतकऱ्यांच्या पिकांचे अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारकडून या नुकसानीचे पंचनामे झाले असून देखील काही शेतकरी त्यापासून अजून वंचितच आहेत .त्यामुळे ह्या वर्षीचा मान्सून शेतकऱ्यांसाठी नुकसानीचा आहे का ? फायद्याचा असा प्रश्न पडलेला असतानाच हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले की राज्यात यंदाचा मान्सून वेळेवर हजर होणार असून त्याला कोणतीही अडचण येणार नाही.

यंदाचे मान्सून वेळेवर हजर होणार. 

यंदाचा मान्सून राज्यात वेळेवर हजर होणार असल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी सांगितले . बरेचदा हवामानामुळे मान्सून राज्यात उशिराने दाखल होतो याचा फटका शेतकऱ्यांना बसत असतो. परंतु यावेळीचा मान्सून हा आशादायी असणार आहे असेही ते म्हणाले आहे. राज्यातील सर्व भागात मान्सून वेळेवर हजर होणार असल्याने यंदाचा मान्सूनचा काळ हा शेतकऱ्यांसाठी आनंदाचा असणार , असे त्यांनी सांगितले. 20 ते 22 मे किंवा त्या आधी मान्सून अंदमान निकोबारात दाखल होणार आहे,असा अंदाज हवामान तज्ज्ञ रामचंद्र साबळे यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांची जय्यत तयारी सुरु केली. 

महाराष्ट्रात येत्या काही दिवसात मान्सून येणार असल्यामुळे शेतकऱ्यांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. यंदाचा मान्सून वेळेवर येण्यास कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांना हा काळ दिलासादायक असणार आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरणीची जय्यत तयारी सुरु केली आहे. 

Leave a Reply