
kanda bajarbhav : पावसामुळे बाजारात ओला कांदा येत आहे. चांगल्या दर्जाचा कांदा कमी असल्याने ओला कांदा आणि कमी दर्जाचा कांदा यांना या आठवड्यात तुलनेने कमी भाव मिळत आहे. त्याचा परिणाम राज्याच्या सरासरी बाजारभावावर झालेला आहे. येणाऱ्या काळात ओला कांदा आवक कमी झाल्यास चांगल्या कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
काल १७ जून रोजी राज्यातील कांदा बाजारात दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाला. यामध्ये काही बाजार समित्यांमध्ये दर वाढले, तर काही ठिकाणी घसरण झाली. शेतकऱ्यांना याचा अंदाज घेण्यासाठी खाली सविस्तर माहिती दिली आहे.
या दिवशी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत कांद्याला सरासरी १६५० रुपये दर मिळाला आणि येथे सर्वाधिक म्हणजे २५१३ रुपये प्रतिक्विंटल असा दर नोंदवला गेला. दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर बाजारात सरासरी दर केवळ ९०० रुपये इतका नोंदला गेला, जो राज्यातील सर्वांत कमी दर होता.
१६ जूनच्या तुलनेत १७ जून रोजी राज्यातील सरासरी दरात किंचित घट झाली. १६ जून रोजी सरासरी दर अंदाजे १३८० ते १४०० रुपयांच्या दरम्यान होता, तर १७ जूनला तो सरासरी १३५० ते १३७० रुपये इतका राहिला. त्यामुळे दरामध्ये थोडीशी घसरण झाली असल्याचे दिसून आले.
कमीत कमी दराच्या बाबतीत छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला केवळ ३०० रुपये दर मिळाला, जो राज्यातील सर्वात कमी दर होता. याशिवाय लासूर स्टेशन, सोलापूर, इंदापूर आणि मालेगाव मुंगसे या बाजारातसुद्धा कमीत कमी दर १०० ते २६० रुपये इतकाच राहिला.
*प्रमुख बाजार समित्यांतील सरासरी दर*
* लासलगाव – १६२० रुपये
* पिंपळगाव बसवंत – १६५० रुपये
* पुणे – १२५० रुपये
* सोलापूर – ९५० रुपये
* अहिल्यानगर – १४५० रुपये
* छत्रपती संभाजीनगर – ९०० रुपये
* लासूर – १००० रुपये
*राज्यातील आवक अशी:*
सोमवार दिनांक १६ जानेवारी रोजी राज्यातील कांदा आवकेची अंतिम आकडेवारी पुढीलप्रमाणे
एकूण आवक ३ लाख २८ हजार क्विंटल अशी होती. त्यापैकी जिल्हावार सर्वाधिक आवक: नाशिक: १ लाख ८० हजार, अहिल्यानगर: ४६ हजार क्विंटल, सोलापूर १९ हजार, पुणे: सुमारे ११ हजार क्विंटल, धुळे : १८ हजार क्विंटल, छत्रपती संभाजीनगर: २८ हजार क्विंटल अशी होती.
मंगळवार दिनांक १७ जानेवारी रोजी कांदा आवक २ लाख २२ हजार क्विंटल (आवक आकडा अपडेट होत आहे) अशी होती, त्यापैकी नाशिक १ लाख २७ हजार, अहिल्यानगर २५ हजार, धुळे: १७ हजार क्विंटल अशी आवक झाली.
या आकडेवारीवरून दिसते की काही प्रमुख बाजार समित्यांमध्ये सरासरी दर टिकून आहेत, पण काही ठिकाणी दर घसरले आहेत. एकूण आवक वाढलेली असताना काही ठिकाणी दराचा दबाव जाणवतोय. शेतकऱ्यांनी यावरून बाजार समिती निवडताना जागरूक राहणे गरजेचे आहे. कुठे आवक जास्त आहे, कुठे दर चांगले आहेत, याचा विचार करून आपला कांदा विक्रीस पाठवावा, असा सल्ला दिला जात आहे.