कृषी विभागाकडून ‘खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचे’ आयोजन ,प्रयोगशील शेतकऱ्यांकडून प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात ..

प्रयोगशील शेतकऱ्यांकडून राज्यातील खरीप हंगाम २०२४ मधील ११ पिकांच्या स्पर्धांसाठी प्रवेश अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे.उडीद व मूग पिकासाठी ३१ जुलैपर्यंत तसेच बाजरी, मका,भात, ज्वारी, तूर, सोयाबीन, भुईमूग, नाचणी (रागी), व सूर्यफुलासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येतील.

स्पर्धेत भाग घेण्‍यासाठी शेतकऱ्याकडे स्‍वतःच्‍या नावावर जमीन असावी. तसेच त्याची जमीन तो स्वतः करत असणे आवश्यक आहे .प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क आहे . सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये व १५० रुपये आदिवासी गटासाठी आहे. कोणत्याही शेतकऱ्याला एकाचवेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येईल, असे कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे .

भात पिकासाठी स्पर्धक शेतकऱ्याकडे किमान २० आर जमिन असणे गरजेचे आहे व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर म्हणजेच किमान एक एकर क्षेत्रात सलग लागवड असणे गरजेचे आहे .तालुकास्तरावर पीकस्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरीय पीकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरली जाईल व राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.

स्पर्धेत भाग घेत असलेल्या शेतकऱ्याला प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, अर्ज (प्रपत्र-अ) सोबत, आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र जोडावे लागेल. सातबारा व आठ-अ उतारा, तसेच, पीकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित सातबारावरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित नकाशा, बँक खात्याचे पासबुक किंवा चेकच्या पहिल्या पानाची फोटो ची प्रतदेखील जोडावी लागेल. www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात स्पर्धेचा तपशील मिळेल असे कृषी आयुक्तालयाने सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *