काल पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली . त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते .
मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय खालील प्रमाणे…
✅ यावर्षी सुद्धा मुंबईकरांना मालमत्ता कर वाढ नाही.
✅ राज्यामध्ये नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करून 2 लाख रोजगार उपलब्ध करून देणार , स्वयंरोजगार निर्माण करणार.
✅ शासन ज्येष्ठ नागरिकांसाठी संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी लाभ देणार.
✅ आता नगरोत्थान महाभियान राज्यातील सर्व पालिकांमध्ये राबवणार. पायाभूत सुविधा बळकट करणार.
✅ शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी बांबू लागवडीसाठी अनुदान देणार.
✅ संपूर्ण राज्यात मधाचे गाव योजना राबवणार. मध उद्योगाला बळकटी मिळणार .
✅ पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी जुन्नर तालुक्यात ‘बिबट सफारी. ‘
✅ लमाण ,बंजारा, समाजाच्या तांड्यांचा विकास करणार. त्यांना मूलभूत सुविधा देणार
✅ शिर्डीमधील विमानतळाचा अधिक विस्तार, नवीन इमारत उभारणी
✅ धारावी पुनर्वसनासाठी केंद्राची मिठागर जागा मागणार.
✅ सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित भत्ते.
✅ सांगोला मधील स्व.बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पास सुधारित मान्यता.
✅ बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य. पतसंस्थांना मजबूत करणार.
✅ कोंढाणे लघु प्रकलपाच्या कामास जादा खर्चास मान्यता.
✅ तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार.
✅ नांदेडच्या गुरुद्धारासाठी तख्त सचखंड श्री हजूद सादिब गुरुद्धारा अधिनियम.
✅ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचावण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार.
✅ आता कृषी विद्यापीठातील शिक्षकांच्या सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष.
✅ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक बांधकामचे नवीन मंडळ कार्यालय.
✅ गोसेवा आयोगासाठी सहआयुक्त पशुसंवर्धन पद.