नव्या कापसाला हमीभावापेक्षा मिळतोय जास्त दर , पहा सविस्तर…

नव्या कापसाला हमीभावापेक्षा मिळतोय जास्त दर , पहा सविस्तर

कापसाचा नवा हंगाम तोंडावर आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली . महाराष्ट्र, तेलंगणा ,आंध्रप्रदेश सह नव्या कापसाच्या लिलावाचा प्रारंभ झाला.  पण खरी आवक सुरू झाली ती पंजाब, हरियाणा आणि राजस्थान मध्ये या तिन्ही राज्यांमध्ये हमीभावापेक्षा जास्त भावाने कापसाची व्यवहार पार पडत आहेत.  सुरुवातीलाच हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत असल्याने हंगाम जोमात सुरू झाल्यानंतरही हा भाव टिकून राहण्याचा अंदाज आहे.

सध्या पंजाब, हरियाणा व राजस्थान या राज्यांमध्ये नव्या कापसाची आवक वाढत आहे, पण सध्या प्रमाण कमी असून.  नव्या कापसाचे व्यवहार 7400 ते 7700 रुपयांच्या दरम्यान होत आहेत.

सरकारने यंदा लांब धाग्याच्या कापसासाठी ७ हजार २० रुपयांचा हमीभाव जाहीर केला तर जुना कापूस 7000 पासून विकला जात आहे.  देशाच्या इतर भागातही हा भाव मिळतोय.अमेरिकेच्या कृषी विभागाने अर्थात युएसडीए ने मागील तीन महिन्यात सतत जागतिक कापूस उत्पादन अमेरिका आणि भारताच्या कापूस उत्पादनात घटीचा अंदाज दिला.

सप्टेंबरच्या अहवालातही मागील महिन्यातील अंदाजापेक्षा कमी उत्पादन राहील असे म्हटले आहे अमेरिकेच्या ताज्या अहवालात कृषी विभागणी जागतिक कापूस उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा सहा टक्क्यांनी घटेल असे म्हटले आहे.

तर ऑगस्ट महिन्यातील अंदाजाच्या तुलनेत सप्टेंबरमधील  अंदाजात अमेरिका आणि भारतातील उत्पादन आणखीन कमी होईल असा अंदाज दिला.  आता जागतिक कापूस उत्पादनात भारत दुसऱ्या तर चीन तिसऱ्या क्रमांकावर आहे . पण या दोन्ही देशांमधील उत्पादन अंदाजात सातत्याने घट केली जात आहे.

दुसरे कारण म्हणजे देशातील दुष्काळी स्थिती . यावर्षी महत्त्वाच्या कापूस उत्पादन राज्यामध्ये पावसाने  दडी दिली.  असल्यामुळे देशातील कापूस लागवड यंदा सव्वा तीन टक्क्यांनी कमी झाले आहे.  त्यामुळे साहजिकच देशातील कापूस उत्पादन कमी झालेले आहे,  असा अंदाज आहे . देशांमध्ये किती कापूस उत्पादन होईल . याबाबत देशातील उद्योग संघटनांनी अद्याप अंदाज दिला नाही.  पण अमेरिकेच्या कृषी विभागाने हा अंदाज दिलेला आहे.

पण युएसडीएने मागील दोन महिन्यांमध्ये भारतातील कापूस उत्पादकाचा अंदाज कमी केला . मागील महिन्यामध्ये अंदाजे 326 लाख गाठी कापूस उत्पादन होईल असे म्हटले होते,  पण चालू महिन्यातील अंदाज  ३२० लाख गाठींपर्यंत  कमी करण्यात आला.  यूएसडीएने मागील खरिपातील उत्पादन 332 लाख गाठींवर स्थिरावले होते असे सांगितले.

दुष्काळी स्थितीमुळे उत्पादकतेत घट.. 

मध्य भारत आणि दक्षिण भारतात दुष्काळी स्थितीमुळे उत्पादकता घटत आहे.  तर उत्तर भारतासह देशभरात कापूस पिकांवर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या बातम्या येत आहेत. 

सध्या गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाचे प्रमाण कमी असेल तरी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  पंजाब, हरियाणा, राज्यांमध्ये ही समस्या जास्त आहे . सध्या आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव तेजित असून देशातही वायद्यांमध्ये कापसाला चांगला भाव मिळत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *