केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा झाल्या ? जाणून घ्या सविस्तर…

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आजचा अर्थसंकल्प मांडला आहे.मोदी सरकारचा हा 13 वा अर्थसंकल्प आहे. तर निर्मला सीतारामन यांचा हा सातवा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात आदिवासी, गरीब, शेतकरी, तरुणांवर,आणि महिलावर या अर्थसंकल्पामध्ये जास्त फोकस केला आहे. अनेक मोठ्या घोषणा यावेळी करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधांवर अर्थसंकल्पातून भर दिला आहे . आयकरात बदल केला आहे . तसेच आंध्रप्रदेश व बिहारसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजना जाहीर केल्या आहेत

🔰 महत्त्वाच्या घोषणा

पाच राज्यांसाठी नवीन किसान क्रेडिट योजना आणणार

लँड रजिस्ट्रीवर 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती नोंदवली जाणार आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या 100 हून अधिक शाखा पूर्वेकडी राज्यात उघडणार आहेत.

ग्रामीण विकासासाठी 2.66 लाख कोटींची तरतूद

भाजीपाला उत्पादन व भाजी पाला वितरण करण्यासाठी आणखी एफपीओ स्थापन केले जाणार

आंध्रप्रदेशाला 15 हजार कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य

5 हजार रुपये मासिक भत्ता पंतप्रधान इंटर्नशीप योजनेनुसार मिळणार आहे.

पहिल्यांदाच सरकारी नोकरी लागलेल्या तीस लाख तारुण्याचे एक महिन्याचे पीएफ आंशिकरित्या सरकार भरणार आहे .

केंद्र सरकार आसाम मधील पूर नियंत्रणासाठी आर्थिक मदत करणार आहे

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1.8 कोटी लोकांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे.

बिहारच्या कोसीसाठीही योजना राबवणार आहे.

ऊर्जा सुरक्षा आणि बदलासाठी एक धोरणात्मक निर्णय सरकार घेणार आहे.

पीएम आवास योजनेअंतर्गत शहरी 2.0साठी १ कोटी कुटुंबाला घरे दिली जाणार आहेत . त्यासाठी सरकार 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे

शहरी घरांसाठी स्वस्तात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी सरकार व्याज सबसिडी योजना आणणार आहे .

राज्यांसाठी कर्जाची मर्यादा वाढवण्यात आली आहे

स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी एंजल टॅक्स प्रणाली रद्द

सरकार परदेशी कंपन्यांवरील कार्पोरेट टॅक्स दर चाळीस टक्क्यांवरून पस्तीस टक्के करणार.

टॅक्स प्रकरणे सहा महिन्यात सोडवणार

पुढील सहा महिन्यामध्ये इन्कम टॅक्स अॅक्ट 1961ची समीक्षा केली जाणार आहे .

बिहारमध्ये हायवेसाठी 26 हजार कोटींची तरतूद

🔰 न्यू रिजीममध्ये असा असेल टॅक्स स्लॅब

0-3 लाखाच्या उत्पन्नावर कोणताच कर नसेल

तीन ते सात लाखाच्या उत्पन्नावर 5 टक्के कर

सात ते दहा लाखाच्या उत्पन्नावर 10 टक्के कर

दहा ते बारा लाखाच्या उत्पन्नावर 15 टक्के कर

बारा ते पंधरा लाखाच्या उत्पन्नार 20 टक्के कर

पंधरा लाखाहून अधिकच्या उत्पन्नावर 30 टक्के कर

जुन्या टॅक्स स्लॅबमध्ये काहीच बदल नाही

🔰 काय स्वस्त होणार

मोबाईल फोन

चार्जर

कॅन्सरची तीन औषधे

मासे

सोने, चांदी

चामड्यांपासून बनवलेल्या वस्तू

Leave a Reply