सोयाबीन आणि तुरीला किती मिळतोय बाजारभाव ,जाणून घ्या सविस्तर…

सोयाबीन हे नगदी पीक आहे.काही दिवसांपासून सोयाबीन चे भाव वाढण्याऐवजी कमीच होऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडू लागली आहे. मागील वर्षी सोयाबीनला ५ हजारांवर दर मिळाला होता. परंतु यंदा ४ हजार ६०० रुपयांवर सोयाबीनचा भाव आहे.

यावर्षी तुरीचे उत्पादन कमी झाल्यामुळे तुरीचे भाव वाढले आहे,तसेच हरभऱ्याचे भाव वाढले आहे. दरम्यान सोयाबीनचेही उत्पादनामध्ये घट झाली . परंतु भाव काही वाढत नाहीत.

७ हजार रुपये तुरीला हमीभाव असताना ही तूर क्विंटलमागे १० हजार रुपयांच्यावर विक्री होत आहे. ७ हजार कापसाचा हमीभाव असताना कापूस ६ हजार ८०० रुपये क्विंटलपर्यंत विक्री होऊ लागला आहे. मात्र सोयाबीनच्या दरामध्ये काही वाढ होत असताना दिसत नाही . मागील वर्षी नगदी पीक सोयाबीन ५ हजारांवर पोहोचले होते.

मात्र सोयाबीन चा भाव ४ हजार ४४० ते ४ हजार ६०० रुपये आहे . येत्या काही दिवसांमध्ये तरी सोयाबीनला योग्य भाव द्यावा, तालुक्यातील शेतकऱ्यांतून अशी मागणी होत आहे.

खासगी बाजारात शंभर रुपयांचा फरक

वर्षभर क्विंटलमागे ५५०० रुपयांच्या दरम्यान हरभऱ्याचे दर राहिले.हरभराचा हमीभाव ५४४० रुपये असताना आता ६३५० रुपयाचा दर मिळत आहे . त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला. यंदा खासगी बाजाराचे दर, नाफेडचे दर, यामध्ये १०० रुपयांचा फरक होता. त्यामुळे खासगी बाजारात शेतकऱ्यांनी हरभरा विकला. आता पुन्हा हरभरात थोडीफार तेजी येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply