Godavari ghore : कोकणातील पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प प्रगतीपथावर..

Godavari Ghore : कोकणातील पाण्याचे गोदावरी खोऱ्याकडे वळवण्याचा प्रकल्प आता प्रगतीपथावर असून, या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे कोरडवाहू भागात सिंचनाची शक्यता वाढणार असून, पाणीटंचाईमुळे होणारे शेतीचे नुकसान कमी होणार आहे. या प्रकल्पाच्या कामांचा आढावा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला. यावेळी त्यांनी सर्वेक्षणाची […]
Cotton cultivation : या राज्यात कापूस लागवडीला सुरूवात; बोंडअळी नियंत्रणासाठी महत्त्वाच्या टिप्स…

Cotton cultivation : खरीपाच्या पावसानंतर जमिनीत ओलावा किंवा वाफसा तयार झाल्यानंतरच महाराष्ट्रात कापसाची लागवड सुरू होते. मात्र राजस्थानमध्ये कापसाच्या लागवडीला सुरुवात झाली असून, यंदाच्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा धोका टाळण्यासाठी राज्य सरकारने विविध उपाययोजना राबवण्याचे जाहीर केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने बीटी कापसाची लागवड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून गुलाबी बोंड […]
Agricultural loans : कृषी कर्जासाठी शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची अट नको; मुख्यमंत्र्यांची बँकांना ताकीद…

Agricultural loans : शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचे दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकऱ्यांवरही होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना सिबिल स्कोअर मागू नका. बँकांना यापूर्वीही यासंदर्भात सक्त ताकीद देण्यात आली आहे. यापूर्वी यासंदर्भात निर्देश न जुमानणाऱ्या बँकावर ‘एफआयआर’ देखील दाखल केले आहेत. रिझर्व्ह बँकेने सुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बँक शाखा सिबिल स्कोअर मागत […]
Onion market price : आठवड्याच्या सुरूवातीला राज्यात बंपर कांदा आवक; भाव टिकून…

Onion price : राज्यात आठवड्याच्या सुरूवातीला म्हणजेच सोमवारी कांद्याची बंपर आवक झाली. मात्र भाव टिकून राहिल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. काल दिनांक १९ मे रोजी सोमवारी राज्यात सुमारे २ लाख ७५ हजार क्विंटल कांदा आवक झाली. एकट्या नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्याची १ लाख ८४ हजार ३६५ क्विंटल इतकी कांदा आवक झाली. त्याखालोखाल मुंबईत २० हजार […]
Market prices of crops : हळद हसली; सोयाबीन, मका रुसला; कसे आहेत साप्ताहिक बाजारभाव…

Market prices of crops : स्मार्ट प्रकल्पाच्या बाजारभाव अहवालानुसार १९ मे २०२५ रोजी संपलेल्या आठवड्यात काही पिकांच्या बाजारभावात वाढ झाली, तर काहींच्या किंमतीत घट झाली. या आठवड्यात तूर, हरभरा आणि हळद या पिकांच्या दरात वाढ दिसून आली, तर सोयाबीन आणि मका यांच्यामध्ये किंचित चढ-उतार नोंदवले गेले. मक्याच्या बाजारभावाचा मागील काही आठवड्यांपासून स्थिर स्वरूपातच राहिला आहे. […]
Monsoon rain : मॉन्सूनचा पाऊस कुठपर्यंत आला; राज्यात पावसाचा काय आहे इशारा…

Monsoon rain : देशात नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरू झाली आहे. आज दि. २० मे रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत मोसमी पावसाची उत्तरेकडील सीमा दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन भाग, दक्षिण व मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मोसमी वारे आणखी पुढे सरकून दक्षिण अरबी समुद्र, मध्य बंगालचा […]
Agriculture Resolution : यंदाच्या खरीप हंगामापूर्वी देशभरात ‘विकसित कृषी संकल्प अभियान’…

Agriculture Resolution : खरीप हंगामापूर्वी भारत सरकारकडून देशव्यापी ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ 29 मे ते 12 जून 2025 दरम्यान राबवले जाणार आहे. केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या अभियानाचा उद्देश शेतकऱ्यांपर्यंत वैज्ञानिक शेती पद्धती, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि स्थानिक शेतीविषयक उपाय पोहोचवणे हा आहे.हे […]
Grape vines : द्राक्ष वेलींच्या सुकण्याचे संकट; या उपाययोजना तातडीने करा…

Grape vines : सध्या्य उष्ण हवामान आणि अचानक वाढवलेले पाणी यामुळे अनेक नाशिक जिल्ह्यासह द्राक्ष पट्ट्यातील द्राक्ष बागांमध्ये द्राक्षाच्या वेली सुकण्याच्या समस्येने शिरकाव केला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही समस्या आर्थिक नुकसान करणारी ठरत असून, वेळेत उपाय न केल्यास संपूर्ण वेल सुकण्याचा धोका निर्माण झाला आहे. इगतपुरी येथील कृषी संशोधन केंद्राच्या हवामान आधारित सल्ल्यानुसार, वाढत्या […]
Clean Plant Program : रोप संशोधनासाठी पुण्यात ‘क्लिन प्लांट प्रोग्रॅम’साठी प्रयोगशाळा स्थापन होणार…

Clean Plant Program : शुद्ध आणि रोगमुक्त रोपवाटिका तयार करण्यासाठी पुण्यात ‘क्लिन प्लांट प्रोग्रॅम’ अंतर्गत रोपट्यांच्या मूळ प्रतीच्या संशोधनासाठी एक स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली. नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ अंतर्गत झालेल्या कृषी संवाद कार्यक्रमात चौहान यांनी […]
Climate change : वातावरणात बदल; ऊस, हळदीसह फळबागेची अशी घ्या काळजी …

Climate change : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने हवामानाच्या पार्श्वभूमीवर पीक आणि फळबागांसाठी महत्त्वाचा सल्ला दिला आहे. सध्या जास्त तापमान व पावसाची उघडीप या दोन्हींचा विचार करून पिकांचे व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ऊस पिकासाठी तज्ञांनी सल्ला दिला आहे की, गरजेनुसार पाणी द्यावे. तणनियंत्रणासाठी […]