fertilizers for Kharif : यंदा खरीपासाठी खतांचा साठा समाधानकारक; रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात…

fertilizers for Kharif : सध्या देशात रब्बी हंगाम शेवटच्या टप्प्यात असून बहुतांश रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. एकूण ६६०.६५ लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकांची लागवड झाली होती. यातील ९२.१९ टक्के क्षेत्रात काढणी पार पडली आहे. प्रमुख पिकांपैकी गहू, हरभरा, मोहरी, ज्वारी, गावर, उडीद, मूग यांसह अनेक पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. गहू हे रब्बी […]
Wheat production : यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन; ५३ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचण्याची शक्यता..

Wheat production : यंदा 2024-25 या चालू कृषी वर्षात भारतात गहू उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंदाजानुसार यावर्षी देशात सुमारे ५३ दशलक्ष टन गहू उत्पादन होणार आहे. ही मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ११ टक्क्यांनी अधिक वाढ असून, गव्हाच्या उत्पादनाच्या बाबतीत हे विक्रमी वर्ष ठरण्याची शक्यता आहे. गहू हे रब्बी हंगामात घेण्यात येणारे […]
unseasonal rains : मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर, अवकाळी पावसाची चिंता कायम..

Unseasonal rain : महाराष्ट्रात मान्सूनची वाट उत्सुकतेने पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, यंदाचा नैऋत्य मोसमी पाऊस (Southwest Monsoon) सध्या अंदमान-निकोबार बेटांपर्यंत पोहोचलेला आहे. आगामी तीन ते चार दिवसांत तो दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, कोमोरिन परिसर आणि दक्षिण बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकण्याची शक्यता आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्रात मान्सून ५ ते […]
Crop insurance : यंदाच्या खरीपासाठी सुधारित पीक विमा; किती हप्ता भरावा लागणार? जाणून घ्या…

Crop insurance : आता खरीपातील पिकविमा योजनेसाठी १ रुपया नाही तर सुधारित दराने हप्ता भरावा लागणार आहे. राज्य शासनाने खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत (PMFBY) काही महत्त्वाचे बदल करून सुधारित योजना लागू केली आहे. १३ मे २०२५ रोजी कृषी विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला असून, शेतकऱ्यांनी या नव्या बदलांची नोंद घेणे […]
Tapi Mega Project : दिलासादायक, तापी मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे २.३४ लाख हेक्टर सिंचनाखाली…

Tapi Mega Project : विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना लवकरच सिंचनाच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. तापी नदीवर उभारण्यात येणाऱ्या मेगा रिचार्ज प्रकल्पामुळे या भागातील २ लाख ३४ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. यामुळे खारपाण झालेल्या जमिनी पुन्हा सुपीक बनतील, पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी […]
kanda bajarbhav : कांदा स्थिरावला; उन्हाळीसह चिंचवड कांद्याला काय भाव मिळतोय?

kanda bajarbhav : मागील दोन आठवड्यापासून राज्यात कांद्याची आवक वाढताना दिसत होती. मात्र या आठवड्याच्या सुरूवातीला कांदा आवक मर्यादित होताना दिसत आहे. अवकाळी पावसाने खराब होऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी कांदा मोठया प्रमाणात विक्रीला आणला होता. त्याचा परिणाम बाजारभाव कमी होण्यात झाले. अजूनही राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण आहे. सोमवारपासून कांद्याची आवक मर्यादित होत असून सोमवारी मागच्या […]
sugar export : यंदा किती झाली भारतातून साखरेची निर्यात? जाणून घ्या…

sugar export : भारताने चालू २०२४–२५ साखर विपणन हंगामात एप्रिल महिन्यापर्यंत एकूण ४.२४ लाख टन साखर निर्यात केली आहे. साखर हंगाम ऑक्टोबरपासून सुरू होतो आणि पुढील वर्षी सप्टेंबरपर्यंत चालतो. केंद्र सरकारने २० जानेवारी २०२५ रोजी १० लाख टन साखरेच्या मर्यादित निर्यातीला परवानगी दिली होती. त्यानुसार निम्म्याच्या आसपास साखर आतापर्यंत विदेशात पाठवली गेली आहे. अखिल भारतीय […]
Tur bajarbhav : राज्यात या बाजारात तुरीला मिळाला सर्वाधिक दर, जाणून घ्या कुठे ते..

Tur bajarbhav : एकीकडे सरकारी हमीभावाने तुरीच्या खरेदीची मुदत वाढवून घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे, तर दुसरीकडे राज्यातील बाजारात तुरीचे दर अजूनही हमीभावापेक्षा कमीच असल्याचे दिसून येत आहे. काल दिनांक ११ मे २०२५ रोजी महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांमध्ये तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाली. या दिवशी राज्यात तुरीची एकूण सुमारे २५,००० क्विंटलांहून अधिक आवक नोंदली गेली. […]
Rainy weather : पावसाळी वातावरणात द्राक्ष , डाळिंबाची कशी काळजी घ्याल?

rainy weather : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील कृषी हवामान विभागाने १० ते १४ मे २०२५ या कालावधीत संभाव्य पावसाचा आणि हवामान बदलाचा अंदाज दिला असून, त्यानुसार द्राक्ष, डाळिंब व आंबा पिकांसाठी महत्त्वाचे कृषी सल्ले दिले आहेत. द्राक्ष पिकासाठी सल्लाद्राक्ष बागांमध्ये सध्या खरड छाटणीस सुरुवात करण्याचा काळ आहे. ओलांड्यावर असलेली जुनी काडी एक जोडा ठेवून छाटावी. […]
Maharashtra Pre-monsoon rains : महाराष्ट्रात पुढील वीस दिवस मान्सूनपूर्व पावसाची शक्यता…

Maharashtra Pre-monsoon rains : सध्या महाराष्ट्रात उन्हाळ्याचे शेवटचे टप्पे सुरू असून, हवामानात हळूहळू बदल जाणवू लागले आहेत. अंदमान आणि आग्नेय बंगालच्या समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा म्हणजेच मान्सूनचा पहिला टप्पा दाखल झाला असून, तेथे चांगला पाऊस सुरू आहे. त्यामुळे मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सून २३ ते ३१ मे या […]