राज्यात निवडणुकांची लवकरच रणधुमाळ ,निवडणूक आयोगाने दिले संकेत…

राज्यात निवडणुकांची लवकरच रणधुमाळ ,निवडणूक आयोगाने दिले संकेत...

राजकीय घडामोडी राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. शिवसेना गटातून वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे गट वेगळा होता. त्यानंतर आता अजित पवार यांचा गट राष्ट्रवादी काँग्रेसमधून वेगळा झाला. आता राष्ट्रवादी अजित पवार गट भाजप-शिवसेना युतीसोबत सत्तेत आला. राज्यात सत्ताधारी पक्ष जास्तच बळकट झाला आहे. राज्यात या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळाले आहे. येत्या सप्टेंबर-ऑक्टोंबरमध्ये राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहे.

कोणत्या होणार निवडणुका

23 महानगरपालिकांची राज्यात निवडणूकची मुदत संपली आहे ,परंतु अद्यापही त्यांच्या निवडणुका झाल्या नाहीत. तसेच 25 जिल्हा परिषदा आणि 207 नगरपालिकांची निवडणुका रखडलेल्या आहेत जिल्हा परिषदे ची निवडणूक ग्रामीण भागासाठी महत्वाच्या असतात. जिल्हा परिषदे सोबतच पंचायत समितीच्या निवडणुका होतात. तसेच राज्यातील 92 नगरपरिषदेमधल्याओबीसी राजकीय आरक्षणाचा ही मुद्दा प्रलंबित आहे. आता निवडणूक आयोगाने राज्यात सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान निवडणुका घेण्याच्या संकेत दिले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर तयारी करायला सुरुवात करावी.

राजपत्रात केला उल्लेख

राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होण्याची शक्यतेचा उल्लेख या पत्रामध्ये केला आहे .हे परिपत्रक सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल झाले आहे.

पाच जुलै 2023 रोजी हे परिपत्रक काढले आहे .या आधी सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य निवडणुका घेण्याचे म्हटले होते.

मुंबई, पुणे निवडणुका कधी होणार.

पुणे मुंबई सह राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या सप्टेंबर मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे .तर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणूक ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुका आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीमच असणार आहेत.

महाराष्ट्र राज्य राजपत्र :- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *