मत्स्यव्यवसाय विभागाचे विविध संस्थांसोबत सामंजस्य करार,विकासासाठी 3 हजार कोटी रुपयांच्या ऐवजी 30 हजार कोटीचा निधी …

720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला लाभला आहे.  त्यामुळे येथे खूप मोठी संधी मत्स्यव्यवसाय विकासासाठी आहे. या क्षेत्रात काम करत असणाऱ्या केंद्रीय संस्थांसोबत मत्स्यव्यवसाय विभागाचा सामंजस्य करार झाला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले की या करारामुळे राज्याच्या सागरी, निमखारेपाणी व भूजल क्षेत्रातील मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना मिळणार आहे. मुनगंटीवार यांनी सांगितले, 3 हजार कोटी रुपयांचा निधी मत्स्यव्यवसायाच्या विकासासाठी 30 हजार कोटी रुपयांवर गेला आहे. .

महाराष्ट्राचा सागरी मत्स्य उत्पादनामध्ये देशात 6 वा क्रमांक आहे. 

देशात सागरी मत्स्य उत्पादनामध्ये महाराष्ट्चा 6 वा क्रमांक आहे. तर भूजल मत्स्य उत्पादनामध्ये 17 वा नंबर आहे. पूर्वी दुर्लक्षित असलेला हा विभाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मत्स्य उत्पादनाला स्वतंत्र विभागाचा दर्जा दिला व 3 हजार कोटी रुपयांचा निधी 30 हजार कोटी रुपयांपर्यंत नेला आहे. त्यामुळे मत्स्यशेती संदर्भात संशोधन विविध संशोधन संस्थांमध्ये होत असते. ते संशोधन नागरिकांपर्यंत तसेच मच्छिमारपर्यंत पोहोचले. तरच त्या संशोधनाचा खऱ्या अर्थाने लाभ सर्वांना होईल , असे मुनगंटीवार म्हणाले. सर्व संस्थांनी मिळून मत्स्य विकासासाठी  काम केले तर या क्षेत्रातील निर्यात 20 टक्क्यांपर्यंत वाढू शकेल.

कोणत्या ठिकाणी काय होणार?

सागरी, निमखारेपाणी आणि भूजल क्षेत्रातील मत्स्योत्पादन वाढ व निर्यातीला चालना मिळण्याकरीता भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या  विविध संस्थांसमवेत मत्स्यव्यवसाय विभागाने सामंजस्य मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत करार केले आहे. यामध्ये चेन्नई केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थान केंद्रीय गोडेपाणी मत्स्य संवर्धन संस्था , केंद्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान, या संस्थांचा समावेश आहे. केंद्रीय खारा जलजीव पालन अनुसंधान संस्थान, चेन्नई बरोबर झालेल्या करारानुसार महाराष्ट्रातील निमखारे मत्स्य शेतीच्या विस्तारासाठी भौगोलिक सर्व्हेक्षण दापचरी, आशियाई सीबास या माशाची मिनी-हॅचरीची जि. पालघर येथे स्थापना करणे,तसेच निमखारे पाणी कोळंबी संवर्धन प्रकल्प, आणि खाऱ्या पाण्यातील मत्स्यपालन (काळूंदर, खेकडा, जिताडा, मिल्क फिश) पथदर्शक प्रकल्प आसनगांव, ता. डहाणू, जि. पालघर येथे उभारणे. एकात्मिक कोळंबी बीज उत्पादन केंद्र बाडापोखरण, ता. डहाणू, जि. पालघर येथे उभारणे. मत्स्य महाविद्यालय, वन्य पी. इंडिकस कोळंबी प्रजनक संकलन केंद्र आणि बीज उत्पादन केंद्र शिरगाव, रत्नागिरी येथे स्थापना करणे. निमखाऱ्या पाण्यातील पिंजरा पध्दतीने मत्स्यपालन महाराष्ट्राच्या तटीय जिल्ह्याच्या किनारी भागात उभारणी करणे, नवी मुंबई येथे जे.एन.पी.टी., शेवा, जलचर प्राणी संसर्गरोध केंद्र आणि रोग निदान प्रयोगशाळाची स्थापना करणे, जिताडा, काळूंदर आणि मिल्क फिश या माशांची महाराष्ट्राच्या तटीय जिल्ह्यांमध्ये नर्सरी संगोपन केंद्र स्थापन करणे,खेकडा पेटी/बॉक्स संगोपन केंद्र महाराष्ट्राच्या तटीय जिल्ह्यात उभारणे आदींबाबत काम केले जाणार आहे.

कौशल्य विमच्छिमारासाठी व उद्योजकासाठी कौशल्य विकास कार्यक्रम होणार. 

केंद्रीय मत्स्यिकी मत्स्यव्यवसाय विषयक विविध विषयांचे लघु कालावधीचे विकसित अभ्यासक्रम केंद्रीय मत्स्यिकी शिक्षण संस्थान बरोबर झालेल्या करारानुसार तयार करणे. महाराष्ट्रातील भूजलाशयीन क्षारपट क्षेत्राचे सर्व्हेक्षण मत्स्य कातडीबाबतचे तंत्रज्ञान विकसित करणे ,मत्स्यबीज केंद्र प्रमाणिकरण व मत्स्यबीज प्रमाणन प्रक्रिया राबविण्याकरीता पाणी तपासणी व मासळी रोगनिदान तपासणी करणे. केंद्रीय मत्स्यिकी प्रौद्योगिकी संस्थान, मासेमारी नौकांसाठी पर्यायी इंधन व्यवस्था विकसित करणे, कोची बरोबर झालेल्या करारानुसार विघटनशील मासेमारी जाळी विकसित करणे,सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत सरदार सरोवर जलाशयाचे सर्व्हेक्षण,आदींबाबत होणार आहे. महाराष्ट्रातील संपूर्ण मच्छिमारासाठी व उद्योजकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. ,समुद्रामधील हरवलेले, वापरात नसलेले,फेकून दिलेल्या जाळ्यांचे मूल्यांकन करणे, आदी कामे केली जाणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *