शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी सुविधा मिळणार! कृषिमंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांसाठी खूशखबर, आता पोस्टाद्वारे माती परीक्षण करण्यासाठी सुविधा मिळणार! कृषिमंत्री धनंजय मुंडे

खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी हवामान बदलाचा अंदाज घेऊन माती परीक्षण आणि आणि बीज संशोधनांवर अधिकाधिक भर द्यावा अशा सूचना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाठविण्याची सुविधाही संबंधित विभागाशी चर्चा करून उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले आहेत. 

मंत्रालयामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कृषिमंत्री मुंडे बोलत होते. या बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव परिमल सिंग, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव महेंद्र घाडगे यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास आणि त्यानुसार पिकांची उत्पादन घेण्यासंदर्भात तसेच बीज निर्मिती प्रक्रिये बाबत शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती असणे आवश्यक आहे. 

यासाठी राज्यातील कृषी विद्यापीठ मार्फत माती परीक्षणासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे शेतकऱ्यांना पोस्टद्वारे माती परीक्षण करण्यासाठी पाठवण्याची सुविधा संबंधित विभागाशी चर्चा करून उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा प्रतिसाद व मागणी विचारात घेता आवश्यकता भासल्यास विद्यापीठातील माती परीक्षण केंद्राची संख्या वाढविण्यात येईल असे मुंडे यावेळी बोलले. 

प्रत्येक प्रकल्प गावात शेती शाळेचे आयोजन

शेतकऱ्यांना सक्षम करणे आणि शेती व्यवसाय की करण्यास सहाय्य करणे हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प गावात शेती शाळेचे आयोजन करावी असे मुंडे यांनी सांगितले.

नवीन संशोधन करण्यावर देखील भर देणार

मागील काही वर्षातील हवामानातील बदलामुळे शेतीवर दुष्परिणाम जाणवत आहेत.  भविष्यातही हवामान बदलामुळे शेती क्षेत्राचे नुकसान होऊ शकते.  यासाठी पूर्वनियोजन आणि उपाययोजना आखणे गरजेचे आहे.  तसेच खरीप व रब्बीत  घेतली जाणारी आंतरपीक यांनी कडधान्य उत्पादनात वाढ व्हावी आणि बदलत्या वातावरणाला अनुकूल असे बियाणे विकसित व्हावे यासाठीही कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठाच्या नवीन संशोधन करण्यावर देखील भर देण्यात येणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी यावेळी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *