शिंदे, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही .

आता रेशनसाठी दुकानात जाण्याची गरज नाही

मंत्रालयीन बैठकीमध्ये रेशन वाटपाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. या नवीन घेतलेल्या निर्णयानुसार रेशन धारकांना रेशन आणण्यासाठी दुकानात जाण्याची गरज नाहीये .कारण आता फिरते शिधावाटप वाहतुकीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप होणार आहे.

शासन आपल्या दारी या योजनेच्या धर्तीवर राज्यात लवकरच रेशन आपल्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे.ग्राहक संरक्षण व अन्न ,नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी याबाबत निर्णय घेतला आहे.

मोबाईल व्हॅनमार्फत शिधावाटप

शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवरच रेशन आपल्या दारी हा उपक्रम लवकरच राबवण्यात येणार आहे.  याबाबत मंत्रालय बैठकीमध्ये अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रवींद्र चव्हाण यांनी निर्णय घेतलेला आहे.

या निर्णयावरूनच रेशन दुकानात जाण्याची गरज आता रेशन धारकांना लागणार नाही. तर आता फिरत्या वाटप वाहतुकीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. मुंबई ,ठाण्यात मोबाईल व्हॅनमार्फत शिधा वाटप करण्यात येणार आहे. तसेच या योजनेची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचे आदेश रवींद्र चव्हाण यांनी दिलेले आहेत. 

Leave a Reply