Todays Kanda bajarbhav : आज लासलगावला कांदा बाजारभाव कसा मिळाला? जाणून घ्या..

Todays Kanda bajarbhav : राज्यात उन्हाळी कांद्याला सरासरी दर 19 एप्रिल रोजी सकाळच्या सत्रात 1075 रुपये प्रतिक्विंटल मिळाला, जो काल म्हणजे 18 एप्रिलच्या 1030 रुपये सरासरी दराच्या तुलनेत 45 रुपयांनी अधिक होता. तर लाल कांद्याला 19 एप्रिल रोजी सरासरी दर 1020 रुपये मिळाला, जो मागील दिवसाच्या तुलनेत जवळपास स्थिर आहे. नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या […]
Smart farming : राज्यात ‘स्मार्ट शेती’साठी एआयचा वापराबद्दल लवकरच धोरण मसुदा ठरणार…

Smart farming : महाराष्ट्र राज्याच्या कृषी विभागाने राज्यातील शेती क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलली आहेत. मंत्रालयात नुकतीच एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत कृषी क्षेत्रातील विविध भागधारक, तज्ज्ञ, नामांकित उद्योगसमूह आणि स्टार्टअप्सनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचा उद्देश राज्यात एआयचा शेतीमध्ये कसा प्रभावी वापर करता येईल, यावर […]
Maize and Gram market prices : या सप्ताहात मका आणि हरभऱ्याचे बाजारभाव असे राहिले..

Maize and Gram market prices : स्मार्ट प्रकल्प अंतर्गत सादर करण्यात आलेल्या साप्ताहिक बाजारभाव अहवालानुसार, महाराष्ट्रातील प्रमुख कृषी बाजारपेठांमध्ये मका आणि हरभरा या पिकांच्या दरात अलीकडील आठवड्यात चढ-उताराचे चित्र दिसून आले. शेतकऱ्यांना विक्रीसाठी अनुकूल वेळ निश्चित करताना या बदलत्या भावाचा विचार करावा लागणार आहे. मक्याच्या किमतींमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून किंचित घसरण दिसत असून १३ एप्रिल […]
Onion purchase : नाफेडकडून कांदा खरेदी कधीपर्यंत सुरू होणार? काय आहेत अटी…

Onion purchase : नाफेडने २०२५ च्या रब्बी हंगामासाठी महाराष्ट्रातील कांदा खरेदी सुरू करण्याची तयारी केली असून, यंदा राज्यातून सुमारे १.५० लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी नाफेडने सहकारी संस्थांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत नाफेडच्या सदस्य संस्था, सहकारी सोसायट्या व प्राथमिक कृषी पतसंस्था यांना प्राधान्य दिले आहे. नाफेडच्या खरेदीच्या […]
Devendra Fadnvis : राज्याच्या कृषीमंत्र्यांची केली मुख्यमंत्र्यांनी कोंडी; हे अधिकार काढून घेतले…

महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या अलीकडील राजकीय भूमिकांमुळे आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे आता त्यांच्यावर सरकारमधूनच दबाव वाढला आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी नुकतेच कृषी खात्यातील बदल्यांचे अधिकार स्वतःकडे घेतले असून, कृषी आयुक्तांच्या बदल्याचाही अधिकार मंत्र्यांकडून काढून घेतला आहे. त्यामुळे कृषी खात्यातील बदल्यांवर नियंत्रण असलेले सर्व अधिकार मंत्र्यांकडून काढून घेण्यात आले आहेत. या प्रकारामुळे […]
banana & mangoes : केळी बागेत पाणी नियोजनाचे आव्हान; आंब्याचीही अशी घ्या काळजी…

banana & mangoes : तापमान वाढल्यामुळे केळीच्या बागेत योग्य पाणी देणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उष्णता कमी झाल्यावरच सरी–वरंबा पद्धतीने पाणी द्यावे, असे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा समितीने सांगितले. केळीचे घड भरलेल्या झाडांना काठीने आधार देऊन उभारणी मजबूत करावी. काढणीस तयार झालेले घड शक्य […]
Agricultural University : मराठवाडा कृषि विद्यापीठात ५७ शिक्षकांना पदोन्नती…

Agricultural University : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात कारकीर्द प्रगती योजना अंतर्गत एकूण ५७ शिक्षकांना उच्च शैक्षणिक वेतनश्रेणी आणि शैक्षणिक स्तरावर पदोन्नती देण्यात आली आहे. अध्यापन, संशोधन आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतील सातत्यपूर्ण योगदानाच्या आधारे ही पदोन्नती मिळाली असून, विद्यापीठात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही प्रक्रिया कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आणि कुलसचिव […]
vine vegetables : उन्हाळ्यात वेलवर्गीय भाजीपाल्याची अशी घ्या काळजी…

vine vegetables : सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक निरीक्षण करून वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असा सल्ला महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्र, इगतपुरी यांनी दिला आहे. वेलवर्गीय भाजीपाला पिकांमध्ये सध्या काळा करपा व केवडा या बुरशीजन्य रोगांचा धोका अधिक […]
Animals heatstroke symptoms : सावधान ! तुमच्या जनावरांमध्ये उष्माघाताची ही लक्षणे तर दिसत नाहीत ना ?

Animals heatstroke symptoms : राज्यात उन्हाची तीव्रता वाढत असताना आता जनावरांवरही उष्माघाताचे संकट गडद होत आहे. एप्रिल महिन्यात तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज असल्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. उष्माघात म्हणजे शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची क्षमता कमी होणे. यामुळे जनावरांचे आरोग्य झपाट्याने बिघडते. योग्य वेळी लक्ष न दिल्यास जीवावर बेतण्याचीही शक्यता असते. उष्माघात […]
Kanda Exporter : कांदा आणि शेतमालाचे निर्यातदार व्हायचंय? मग हे कराच…

Kanda Exporter : कांद्यासह अनेकदा भाजीपाला आणि फळांचे दर पडतात. बऱ्याचदा हे भाव निर्यातीवरही अवलंबून असतात. शेतकरी किंवा शेतकऱ्यांच्या मुलांना निर्यातदार होण्याची संधी आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी आता केवळ स्थानिक बाजारापुरते मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा मार्ग निवडावा, यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (एमएसएएमबी) मदत करत आहे. भाजीपाला, फळे, प्रक्रिया केलेली उत्पादने यांची निर्यात करून […]