ऊस तोडणीनंतर एकही रूपया खर्च न करता वाढवा सेंद्रिय कर्ब, कसा ते जाणून घ्या…

राज्यात ऊसाचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी ऊस तोडणी सुरू असून आता राज्याच्या विधानसभा मतदानानंतर या कामाला वेग येणार आहे. ऊस तोडणीनंतर अनेक ठिकाणी पाचट जाळले जाते, किंवा इतर प्रकारे त्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र योग्य पाचट व्यवस्थापनातून जमिनीला आश्चर्यकारक ठरतील असे फायदे होतात. ऊस तोडणीनंतर ऊसाचे पाचट सर्रासपणे जाळून टाकल्याने अतिशय उपयुक्त […]
या योजनेमुळे वृद्ध शेतकऱ्यांना मिळणार मोफत उपचार, कसे काढायचे कार्ड..

अलीकडेच केंद्र सरकारने देशातील ज्येष्ठ नागरिकांसाठी आयुष्मान वय वंदना योजना लागू केली आहे. आयुष्मान भारत प्रधान मंत्री जन आरोग्य योजना असे योजनेचे नाव असून त्या अंतर्गत नागरिक आपले आयुष्यमान भारत कार्ड तयार करवून घेऊ शकतात. ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकºयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. पण त्यासाठी एक कार्ड तयार करण्याची गरज आहे. 70 वर्षे आणि […]
हिवाळ्यात मागणी वाढल्याने खाद्यतेलांच्या किंमती वधारल्या? तेलबियांच्या किमती वाढून शेतकऱ्यांना फायदा होणार का?

हिवाळ्यात मागणी वाढल्याने मागील सप्ताहात भारतातील खाद्यतेल आणि तेलबिया बाजारात खाद्य तेलांच्या मागणीत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे सर्व प्रकारची तेलं आणि तेलबियांचे बाजारभाव वधारल्याचे पाहायला मिळाले. या क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार सरकारने 14 नोव्हेंबर रोजी खाद्यतेलांवरील आयात शुल्कात वाढ केली आहे. त्यानुसार कच्च्या पाम तेलाच्या (सीपीओ) आयात शुल्कात प्रति क्विंटल 80 रुपयांनी, सोयाबीन डेगमच्या आयात […]
खपली गव्हाचे आहेत असे फायदे? लागवड कराल तर फायदाच फायदा..

खपली गव्हाखाली सध्या मर्यादित क्षेत्र आहे. दिवसेंदिवस हे क्षेत्र कमी होत चालले आहे. परंतु खपली गव्हामध्ये असणाऱ्या पोषक घटकामुळे त्याचे महत्व कायम आहे. खपली गव्हाखाली भारतात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्र आहे. यातील बहुसंख्य खपली ही स्थानिक स्वरुपात खाण्यासाठी वापरली जाते. भारतामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आणि गुजरात या राज्यात खपली गहू ठराविक जिल्ह्यामध्ये घेतला जातो. […]
विधानसभा मतदानामुळे राज्यातील बाजारसमित्यांमधील व्यवहार बंद…

आज दिनांक २० नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदान असल्याने राज्यातील अनेक प्रमुख बाजारसमित्यांतील व्यवहारांना सुटी होती. नाशिक जिल्ह्यात लासलगाव, पिंपळगावसह प्रमुख बाजारसमित्यांना मतदानानिमित्त सुटी असल्याने कांद्याचे व्यवहार होऊ शकले नाहीत. मात्र टोमॅटो साठी प्रसिद्ध असलेल्या गिरणारे, ता. नाशिक येथील बाजारात मतदानानंतर म्हणजेच आज सायंकाळी ६ नंतर टोमॅटोचे व्यवहार होणार होते. दरम्यान मुंबईतील पनवेल बाजारसमितीत भाजीपाल्याचे व्यवहार […]
संसदेचे हिवाळी अधिवेशन या दिवसापासून सुरू होणार; शेतीच्या कोणत्या प्रश्नावर होणार चर्चा…

संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यंदा शेतीसह पर्यावरण, बदलते हवामान, वाणिज्य, प्रक्रिया उद्योग अशा अनेक बाबींवर चर्चा होणे अपेक्षित आहे. शेतमालाच्या हमीभाव वाढीच्या प्रश्नासह बदलत्या हवामानाचा शेती आणि उत्पादकांना बसणारा फटका, खते आणि कृषी निविष्ठांच्या वाढत्या किंमती, कृषी निर्यातीवर वाढते निर्यात मूल्य, कांदा, सोयाबीन, कापूस, दूध आणि ऊसाचे प्रश्न यावर […]
राज्यात सायंकाळी ५ पर्यंत किती टक्के मतदान झाले; १११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान, वाचा सविस्तर

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ४५.५३ टक्के मतदान झाले आहे. तर सायंकाळी पाच पर्यंत राज्यात साधारत: ५८% मतदान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ३ वाजेपर्यंत राज्यात सरासरी […]
*राज्यात ऊस पट्ट्यातील धरणांमध्ये किती पाणी शिल्लक? रब्बीला किती पाणी मिळणार?*

राज्यात रब्बीचा हंगाम सुरू झाला असून बहुतेक ठिकाणी पेरण्या अजून बाकी आहेत. तर ऊसाच्या पट्टयात अजूनही पूर्व हंगामी ऊसाची लागवड सुरू आहे. दरम्यान ऊसासह रब्बी हंगामासाठी किती पाणी मिळणार? तसेच धरणातील पाणीसाठा किती शिल्लक आहे? याची उत्सुकता शेतकऱ्यांना आहे. निवडणुकीनंतर येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून राज्यातील पाण्याचे नियोजन होऊन विसर्ग होऊ शकतो. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस […]
कांद्याच्या बाजारभावाचे झाले रॉकेट, लाल कांद्याला आज काय भाव मिळाला?

या आठवड्यात लासलगाव बाजारसमितीत लाल आणि उन्हाळी कांद्याचे भाव सातत्याने वाढत असून कालच्या तुलनेत आज दिनांक १९ नोव्हेंबर रोजी लाल कांद्याच्या सरासरी बाजारभावात ४०० रुपयांची, तर उन्हाळी कांद्याच्या सरासरी बाजारभावात ५०० रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आले. दरम्यान आज लासलगावसह नागपूर सोलापूर बाजारात कांद्याची आवक काहीशी घसरलेली दिसून आली. कांद्यासाठी प्रसिद्ध असलेल्या लासलगाव बाजारसमितीत आज लाल […]
राज्यात आठवडाभर कसे असेल हवामान, थंडीत होणार का वाढ…

रविवार दि. १७ नोव्हेंबर पासून थंडीत हळूहळू होत असलेली वाढ अजूनही आठवडाभर टिकून असण्याची शक्यता जाणवत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दरम्यान आजपासून पुढील आठवडाभर म्हणजे मंगळवार दि. २६ नोव्हेंबरपर्यन्त महाराष्ट्रात थंडीसाठी अटकाव करणारे कोणतेही वातावरण नसुन ह्या आठवड्यात आकाश निरभ्रतेतून सकाळ-संध्याकाळी थंडीत अजून अधिक वाढ होण्याची शक्यता जाणवत असल्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे […]